परराज्यातून किंवा परजिल्ह्यातून आलेल्या विस्थापितांसाठी मे आणि जून महिन्यामध्ये रेशनचे वितरण केले जाणार आहे . ज्याच्याकडे रेशनकार्ड नाही ,ज्याचे घर नाही त्याला केवळ आधारकार्डच्या आधारे रेशन दिले जाणार आहे .
मात्र कोणीही खोटी माहिती दिल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई किंवा त्याला कारावासाची शिक्षाही भोगावी लागणार , असे पत्रक जिल्हाधिकारी डॉ . एस . बी . बोम्मनहळ्ळी यांनी काढले आहे .
कोरोनामुळे परराज्यातून व परजिल्ह्यातून आलेले कामगार किंवा सर्वसामान्य नागरिक अडकून पडले आहेत . त्यांना केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत रेशन वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे . प्रत्येक व्यवतीला ५ किलो तांदुळ आणि हरभरा डाळ दिली जाणार आहे .
मात्र त्या व्यक्तीकडे रेशनकार्ड असू नये अशी अट घालण्यात आली आहे . या ठिकाणी त्याचे स्वत : चे घर असू नये तो परराज्यातील किंवा परजिल्ह्यातील असावा . आधारकार्ड बघून त्याला रेशन दिले जाणार आहे . मोबाईलवर ओटीपी क्रमांक आल्यानंतर त्याला रेशन दिले जाणार आहे .