कोल्हापूरमध्ये ‘या’ संघटनेची सीमाप्रश्नी बैठक

0
8
Border issue
 belgaum

कोल्हापूर जिल्हा स्वतंत्र सैनिक संघटना, कोल्हापूर जिल्हा खादी व ग्रामोद्योग संघ, कोल्हापूर जिल्हा सर्वोदय मंडळाच्या वतीने महात्मा गांधी प्रार्थना हॉल मध्ये प्रलंबित सीमाप्रश्नावर बैठक झाली. सर्वप्रथम सीमालढ्यासाठी हुतात्मे झाले त्यांना अभिवादन करण्यात आले.

अध्यक्षस्थानावरून सुंदरराव देसाई म्हणाले, आज ६४ वर्षे सीमावासीय लढा देत असून सीमाप्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सीमावासीय आंदोलने, मोर्चे काढत आहेत. पण या प्रश्नाला अजूनही यश आले नाही. प्रामुख्याने राष्ट्रीय नेते शरद पवार, एन. डी. पाटील, सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, मुश्रीफ साहेब, राजेंद्र यड्रावकर यांच्या माध्यमातून सीमाप्रश्न सोडविण्यासाठी सीमावासीयांना आधार दिला आहे.

यामुळे सीमावासियांच्या भाग्य उदयाला येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रश्नी जातीने लक्ष दिले आहे. यामुळे आगामी काळात नक्कीच सकारात्मक काहीतरी घडेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली तसेच सरकारच्या कृतिशील कार्याचे त्यांनी कौतुकही केले.

 belgaum

याप्रसंगी प्रामुख्याने ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी प्राचार्य व्ही. डी. माने, यांनीही आपल्या सीमाप्रश्नावर भावना व्यक्त केल्या. यावेळी स्वातंत्र्य सैनिक कालगोंडा पाटील, आदगोंडा पाटील, सौ. सविता देसाई, एस. एस. तुपद, सखाराम सुतार, प्रकाशराव चौगुले, तसेच सर्व स्वातंत्र्य सैनिक, सरविदायी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.