Monday, April 29, 2024

/

संघर्षाचं नाव म्हणजे समितीचा उमेदवार!

 belgaum

शिष्य : गुरुजी, बेळगाव लोकसभेसाठी समितीच्या उमेदवाराची घोषणा झाली. समितीने सामन्यातील सामान्य माणसाला उमेदवारी दिली. हि समितीची कमकुवत बायजा झाली नाही का?

गुरुजी : वत्सा, समिती म्हणजे काय याचं मूळ तू समजून घेतलं नाहीस…समिती म्हणजे आंदोलन, समिती म्हणजे संघर्ष, समिती म्हणजे आत्मसन्मानाचा हुंदका… समितीने आजवर उमेदवार दिला तो चेहरा म्हणून नाही तर समिती हाच उमेदवार असतो.. जी व्यक्ती समितीच्या माध्यमातून उभी राहते तो स्वतंत्र राहात नाही तर समितीच्या एकंदर मराठी माणसाचा समूह असतो. त्यामुळे महादेव पाटील नावाच्या सामान्य कार्यकर्त्याला समितीने खासदारकीची उमेदवारी देऊन आपल्या संघर्षाची दिशा आणि आजवर संघर्षात माणसं का टिकून राहिली याची प्रचिती दिली.

शिष्य : गुरुजी, हा माणूस लढेल त्यावेळी त्याची ताकद किती असेल?
गुरुजी : त्या माणसाची ताकद व्यक्तिगत रित्या किती आहे, हे तर नंतर बघावं लागेल. मूलतः जी आपली समिती म्हणतो, मराठी माणूस म्हणतो, सीमाभागातील ८६५ गावं म्हणतो, यांच्या मनगटात जी ताकद आहे ती म्हणजेच महादेव पाटील यांची ताकद! समिती ना पैशासाठी लढली, ना सत्तेसाठी लढली ना खुर्चीसाठी लढली… समिती आजवर लढली आणि लढत आहे ते केवळ मराठी माणसाच्या अस्मितेसाठी.. त्यामुळे जिथं जिथं मराठी शब्द आहे.. तिथला शब्द एकत्र करावा.. आणि त्याची ताकद व्हावी तीच समितीच्या उमेदवाराची ताकद!

 belgaum

शिष्य : मग, या उमेदवाराला घेऊन समिती संघर्ष करू शकेल?
गुरुजी : संघर्ष करू शकेल असं म्हणू नकोस… लोकांना इतर उमेदवारांना आमच्या समितीच्या उमेदवारांशी संघर्ष करावा लागेल. मृणाल हेब्बाळकर हा घराणेशाहीचा उमेदवार. आई मंत्रिपदावर, मामा आमदार! घरात असणारे सत्तेचे सोपान! पैशाची आणि सत्तेची ताकद.. पण कार्य म्हणून काय आहे? ती पाटी कोरीच आहे…! दुसऱ्या बाजूला भाजपचे जगदीश शेट्टर.. परक्या गावातून आलेला उमेदवार… मराठी माणसाच्या छाताडावर विधानसौध उभी करून मराठी माणसाला जुंपलेला माणूस. त्याचबरोबर सीमाप्रश्न संपला.. अशी वल्गना करून मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळलेला माणूस… त्याउलट रस्त्यावरच्या प्रत्येक लढाईत दरवेळी उतरलेले महादेव पाटील! मराठीच्या उद्धारासाठी जंग जंग पछाडलेला माणूस म्हणजे महादेव पाटील… मराठीच्या अस्मितेसाठी जितके लढे झाले, त्या लढ्यातून लाठ्या काठ्या झेललेला माणूस म्हणजे महादेव पाटील..! म्हणजे जगभर विचारलं जातं, महाराष्ट्र एकीकरण समिती म्हणजे काय? तर महाराष्ट्र एकीकरण समितीचं रूप म्हणजे महादेव पाटील…!तुम्हाला समजून घ्यायचं असेल, मराठी माणूस कसा लढतो तर त्यासाठी महादेव पाटील हे उत्तम उदाहरण आहेत. अशा संघर्षाच्या आगीतून तावून सुलाखून निघालेला महादेव पाटील म्हणजे खरा सच्चा कार्यकर्ता.. अशा माणसाची उमेदवारी म्हणजे एका निष्ठावंत कार्यकर्त्याची उमेदवारी.
शिष्य : गुरुजी, म्हणजे महादेव पाटील मोठं आव्हान निर्माण करू शकतील असं तुम्हाला वाटतं का?

गुरुजी : केवळ आव्हान नाही, तर एक मोठा आवाका निर्माण करू शकेल.. ज्यावेळी मतमोजणी होईल, त्यावेळी सीमाभागातील लोक समजून घेतील कि समितीने कशी निवडणूक लढविली… समितीचा आजवरचा इतिहास काय आहे? समिती एक माणूस निवडणूक रिंगणात उभं करते.. आणि त्या माणसाच्या पाठीमागे संपूर्ण ताकद उभी राहते… आणि तो माणूस कुठल्या कुठं आपल्या संघटनेची ताकद पोहोचवतो…. आजवर ७ आमदार निवडून आलेला आमचा इतिहास आहे. ती सगळीच माणसं सामान्य होती. एखाद्या सध्या गोष्टीतून असामान्य गोष्टी करण्याची प्रक्रिया ज्या पद्धतीने होते… तशीच पद्धत समितीत सामान्य माणसातून असामान्य गोष्ट करण्याची अजोड कृती समिती करू शकते.

शिष्य : म्हणजे गुरुजी यावेळी समिती आघाडी घेणार तर!
गुरुजी : केवळ आघाडीच नाही तर त्या दोन उमेदवारांच्या नाकर्तेपणावर समितीची फत्तेपणाची मोहोर उठवतील आणि समिती यावेळी निश्चित बाजी मारेल, यात काही शंकाच नाही.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.