Thursday, April 25, 2024

/

शिव सन्मान पदयात्रेबाबत मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी यांचा जोरदार एल्गार

 belgaum

बेळगाव लाईव्ह : विविध उद्देश समोर ठेवून मराठीची ताकद एकजुटीने रस्त्यावर उतरविण्यासाठी आणि मराठीची ताकद सर्वांना दर्शविण्यासाठी रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दि. २२ फेब्रुवारीपासून ‘शिवसन्मान पदयात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. या पदयात्रेला मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी पाठिंबा दिला असून सीमाप्रश्नी हा लढा अंतिम ठराव, अशा शब्दात प्रतिक्रिया व्यक्त करून सीमावासीयांमध्ये नवचैतन्य निर्माण केले आहे.

मराठीचा जागर करणाऱ्या पदयात्रेला मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांचा पाठिंबा लाभला असून एकंदर मराठी माणूस एकत्र येऊन रस्त्यावरची लढाई अधिक तीव्रतेने लढत आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. आजपर्यंत ६५ वर्षात अनेक आंदोलने झाली. त्या आंदोलनात आम्ही अनेक पराभव पचवले. पण मराठी माणूस राखेतून फिनिक्स पक्षी वर यावा याप्रमाणे पुन्हा पुन्हा आंदोलने करत आपला लढा तीव्र करत चालला आहे. हा लढा अखेरचा ठरावा अशी आशा दीपक दळवी यांनी व्यक्त केली. आमचा प्रश्न लवकरात लवकर सुटावा आणि मराठी मनाची असणारी लोकभावना लवकरात लवकर फलद्रुप व्हावी, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

सीमाभागात हाती घेण्यात आलेला हा अभिनव उपक्रम, ५ दिवस मराठी माणसांसोबत एकत्र मेळावा घेणे, मराठी माणसाचे एकत्रीकरण करणे, सीमाप्रश्नासंदर्भात त्यांना सजग करणे आणि एकंदर सध्याच्या लढ्याची पार्श्वभूमी याचप्रमाणे आझाद मैदानावर होणाऱ्या धरणे आंदोलनासंदर्भात जनजागृती करणे अशा अनेक उद्देशाने हि पदयात्रा होत आहे.Chandu konduskar

 belgaum

छत्रपती शिवरायांसंदर्भात होत असलेले राजकारण आणि राजकारणापुरता वापरण्यात येणारा छत्रपतींचा विषय अशा अनेक उद्देशाने होणारी पदयात्रा आणि या पदयात्रेमागचा उद्देश आणि भावना सर्वसमावेशक असल्याने प्रत्येक घटकांना ती लाभदायक ठरणार आहे. यामुळे हि पदयात्रा मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल, त्याचबरोबर मराठी माणसाच्या एकत्रीकरणाची हि प्रक्रिया जोरदारपणाने राबविली जाईल आणि महाराष्ट्र एकीकरण समितीला पुन्हा नवी बळकटी येईल यात काही शंका नाही, असे मत दीपक दळवी यांनी व्यक्त केले.

या पदयात्रेसंदर्भात दीपक दळवी यांनी सूचनाही केल्या. सध्या प्रकृती अस्वास्थामुळे पदयात्रेत सहभागी होणे थोडे अवघड आहे; परंतु पदयात्रेत सहभागी होण्यासाठी मी शक्य तितके प्रयत्न करेन, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. दीपक दळवी यांनी सीमाभागात नवचैतन्य निर्माण करणाऱ्या शिवसन्मान पदयात्रेला पाठिंबा दिला असून या प्रक्रियेमुळे मराठी माणसाचं पाऊल पुढे जाईल, अशे मतही त्यांनी व्यक्त केले. दीपक दळवी यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे आणि त्यांच्या चैतन्य निर्माण करणाऱ्या प्रतिक्रियेमुळे कार्यकर्त्यांचाही उत्साह दुणावेल आणि जनतेत शिवसन्मान पदयात्रा नवचैतन्य निर्माण करेल, असा सूर उमटत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.