Friday, April 19, 2024

/

ग्रामपंचायत पातळीवर ‘आरोग्य अमृत अभियान’ची अंमलबजावणी

 belgaum

बेळगाव : ग्रामपंचायत पातळीवर ‘आरोग्य अमृत अभियान’ची अंमलबजावणी शासनाकडून करण्यात येणार असून रक्तदाब, हिमोग्लोबिन, रक्तातील ग्लुकोज तपासणीचे काम केले जाणार आहे. मागील वर्षीच राज्यातील १४ जिल्ह्यांत प्राथमिक टप्प्यात ही योजना सुरू केली होती. आता बेळगावसह राज्यातील सर्व जिल्ह्यांत ही योजना विस्तारित केली आहे.

कोरोना संसर्ग काळात मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग आदींचा त्रास असलेल्या लोकांना मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्याचे दिसून आले. रुग्णांसाठी रक्तदाब, मधुमेह, रक्तातील ग्लुकोज, हिमोग्लोबिन, बीएमआय चाचण्या वेळोवेळी कराव्या लागतात. ग्रामीण भागात वेळेत या सुविधा उपलब्ध होत नसल्याने आजार वाढतो. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्थापन केल्या जाणाऱ्या टास्क फोर्सकडे या चाचण्यांसाठी आवश्यक असणारे चाचणी साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासह कोरोना किट ग्रामपंचायतींना ठेवावे लागणार आहे.

ग्रामीण विकास आणि पंचायत राज खात्याने याबाबतचा आदेश बजावला आहे. यापूर्वी नोव्हेंबर २०२२ मध्ये याची घोषणा केली होती. पण अंमलबजावणी लांबणीवर पडली. आता त्यावर कार्यवाही सुरू झाली असून आरोग्य खात्याच्या सहकायनि या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. कोरोनाच्या काळात प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर कोरोना प्रतिबंधक टास्क फोर्स तयार केले होते. गावातील युवक, आशा, अंगणवाडी कार्यकर्ता यांचा टास्क फोर्स मध्ये समावेश होता. या टास्क फोर्सचे काम उत्तम झाल्याने याच टास्क फोर्सला आता ‘आरोग्य अमृत अभियान’ची जबाबदारी सोपविली जाणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.