Thursday, April 25, 2024

/

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपला फटकारले

 belgaum

बेळगाव लाईव्ह : भाजप हा खोटं बोलण्याचा कारखाना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून भाजपमधील प्रत्येक नेत्यांकडून खोटे बोलले जात असून भाजपच्या या खोटेपणावर जनता कधीच विश्वास ठेवणार नाही आणि आगामी निवडणुकीत कोणाला निवडायचे हे जनताच ठरवेल अशा शब्दात माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपला फटकारले.

हुबळी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. विविध गावांच्या माध्यमातून महसूल निर्मिती कशी करता येईल याबाबत काँग्रेसने विचार करून कायदा बनविला, महसूल उभारण्यासाठी गावांचा, खेड्यांचा, तांडा आणि वस्त्यांचा कायापालट करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले.

परंतु निवडणुका नजरेसमोर ठेवून काँग्रेसने केलेल्या कामाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या माध्यमातून भाजप लाटत असल्याचा आरोप सिद्धरामय्या यांनी केला. ते पुढे म्हणाले, भाजप हा काँग्रेसने केलेल्या आयत्या जेवणाच्या ताटावर बसलेला पक्ष आहे. सेवालाल जयंती, लमानी विकास महामंडळ या साऱ्याची स्थापना काँग्रेसने केली.

 belgaum

सेवालाल यांच्या जन्मस्थानी जाऊन तेथील परिसराचा विकास काँग्रेसने केला. शेकडो कोटींचे अनुदान दिले. मात्र, भाजप या साऱ्याचे श्रेय आता स्वतः लाटत असून खोटी आमिषे देणारा पक्ष बनला असल्याची टीकाही सिद्धरामय्या यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.