Saturday, July 27, 2024

/

परतीचा पाऊस-भारत नगर येथील कोसळली भिंत

 belgaum

भारत नगर, शहापूर येथील बाजार रोड ( मुख्य रस्ता) वरील धोकादायक अवस्थेत असलेल्या कदम चाळेचा उत्तरेकडील भिंत कोसळली मात्र या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही

रविवारी पासून परतीच्या पावसाने जोर धरला आहे संततधार वृष्टी सुरूच आहे अश्या वेळी अनेक घरांची पडझड होऊ लागली आहे काल रविवारी सौन्दत्ती तालुक्यातील हुलीकट्टी गावात राहत्या घराची भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव घडली होती या घटनेतगंगव्वा रामण्णा मुलीमनी असे या घटनेत मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे.त्या घटने नंतर रविवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास भारत नगर येथे ही घटना घडली आहे.

भारत नगर येथील घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, जीर्ण इमारतीचा कोसळलेला भाग नजिकच्या अनिल पाटील त्यांच्या घरावर पडून घराचे पत्रे फुटून नुकसान झाले. शिवाय पान टपरीचेही पत्रे फुटून नुकसान झाले.Bharat nagar

पाटील कुटुंबातील महेश पाटील हा तरुण शरीराने अपंग असून उदरनिर्वाहासाठी तो पान टपरी चालवतो. पान टपरीवरील पत्र्याचे नुकसान झाल्याने त्याच्यासमोर आर्थिक संकट उभे राहणार आहे.

प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन पाटील कुटुंबियांना नुकसानभरपाई द्यावी तसेच महेश पाटील या अपंग तरुणाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांतून करण्यात येत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.