Saturday, April 20, 2024

/

*ह्योच नवरा पायजे….*

 belgaum

बेळगाव शहर आणि परिसरात सुवासिनी महिलांनी वट पौर्णिमा मोठ्या उत्साहाने साजरी केली.बेळगाव शहर परिसर उपनगरात ज्या ज्या ठिकाणी वडाचे झाडे आहेत त्या ठिकाणी सकाळ पासूनच महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी गर्दी केली होती.आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य लाभो आणि सात जन्मात तोच नवरा मिळो प्रार्थना या सावित्रीनी वडा कडे केली.

आपल्या पुराणकथानी मानवी जीवनाला जगण्यासाठीचे अनेक संचित दिलेले आहेत.त्यामध्ये वटपौर्णिमेचा सण हा एक महत्त्वपूर्ण सण आहे.निसर्ग आपल्याला काय देतो आणि निसर्गाला आम्ही काय देतो,या देवाण-घेवानीचा अतूट संबंध या सणातून आपल्याला निदर्शनास येतो.वडाचे झाड हे अखंड ऑक्सिजन देणारे किंवा निर्माण करणारे झाड आहे.याचा संदेश अशा सणामार्फत आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपल्या इतिहासकारांनी केलेले आहे. सावित्री सत्यवानाचा मृतदेह वडाच्या झाडाखाली घेऊन बसली आणि वडाच्या माध्यमातून यमाला आवाहन करून

सत्यवानाचे प्राण परत मिळवले. याच्या पाठीमागे एक सूक्ष्म संदेश आहे, शुद्ध हवा किंवा ऑक्सिजन हे आपले जीवन असतं. आपल्याला जगण्यासाठी हा शुद्ध हवेची,ऑक्सिजनची गरज आहे. वडासारखे झाड आपल्याला निरंतर ऑक्सिजन पुरवतात, आणि म्हणून वडाच्या झाडाचे संवर्धन झाले पाहिजे, रक्षण झाले पाहिजे या रूपानं स्त्रिया वडाच्या झाडाला दोरा बांधून त्याचं रूपकात्मक बंधन निर्माण करतात आणि वड वाचला पाहिजे याचा संदेश देतात.Vat pournima

ह्या झाडाची निर्मितीक्षमता ऑक्सिजन निर्मितीची आहे.त्याचा या कार्याला हे एक प्रकारचे वंदनच आहे. सर्वसाधारणपणे बघितलं तर गावाच्या बाहेर वडाचं झाड असतंच असतं,गावात चौकात एक वडाचापार असतो. तसं बघितलंतर कोणत्याही झाडाला पार बांधण्यापेक्षा वडाला जास्त पार बांधलेले दिसतात. गावाच्या चौकाचौकात असे पार बांधलेले असतात,कारण त्याच्या खाली लोक बसावेत त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा आणि त्यांचे जीवन सुखकर व्हावे हा संदेश यातून आपल्या पर्यंत पोचतो.,

आणि हा संदेश प्रत्येक सावित्री आपल्या घरापर्यंत घेऊन जात असते म्हणूनच सत्यवानाचे प्राण वाचविण्याचे काम प्रत्येक पिढीतील सावित्री करते हा संदेश आहे!!ह्योच नवरा पाहिजे हा आग्रह आहेच त्याचबरोबर आपलं हे जग ताज्या स्वच्छ आणि ऑक्सिजनयुक्त असावं.हा वृक्ष वाचवा पर्यावरण वाचवा हा संदेश या सणाच्या रूपातून आपल्या पर्यंत पोचतो.

ह्योच नवरा पाहिजे हा आग्रह आहे त्याबरोबर सुंदर अशा वातावरणातही पाहिजे. आधुनिक पिढीचा सत्यवान निश्चितच सावित्रीच्या या भूमिकेचा आदर करेल यात काही शंकाच नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.