Sunday, May 5, 2024

/

गडगडले आसमान आणि कोसळला पाऊस

 belgaum

बेळगाव शहरा सहा मागील दोन दिवसापासून तालुक्यात ही पावसाची हजेरी जोरदार लागली आहे. त्यामुळे उष्म्यमध्ये वाढ झालेली कमी झाले असून आता गारव्याचा अनुभव नागरिकांना येऊ लागला आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून सातत्याने बेळगाव शहर परिसरात जोरदार पावसाची हजेरी लागले आहे.

गारांसह पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक बालचमूना आनंद व्यक्त करता आला आहे. जोरदार वाऱ्यासह ढगांचा गडगडाट आणि विजेचा कडकडाट असा पाऊस सुरु झाला आहे. ग्रामीण भागामध्ये तर पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जे भाजीपाला पीक घेणारे शेतकरी आहेत त्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हा पाऊस असाच सुरू राहिला तर आणखी नुकसान होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

सकाळपासूनच उष्म्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे अंगा मधून घामाच्या धारा वाहत होत्या. रविवारी सुट्टीचा दिवस असला तरी अनेकांनी पंख्यावर उष्मा कमी करण्याचा संदर्भ निवडला होता. मात्र दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेकांना समाधान व्यक्त करण्यात येत आहे. बाजारपेठ साठी गेलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली असून आडोसा शोधावा लागला आहे. वळीवाच्या जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.Rain

 belgaum

गारा गोळा करण्यासाठी बाळचमूनची एकच गर्दी झाली होती। पावसात भिजतच त्यांनी गारा गोळा करून आपला आनंद व्यक्त केला आहे. या झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे तर काही घरांची पडझड झाली आहे दैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र हेस्कॉमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। विद्युत तारांवर झाडांच्या फांद्या कोसळून विद्युत पुरवठा खंडित झाला होता. याद बरोबर साधारणतः अर्धा तास पावसाने हजेरी लावली त्यानंतर विश्रांती घेतली. मात्र बऱ्याच अंशी शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत. या पावसामुळे अनेक आणि घरात विश्रांती घेणे बरे असे अनेकांनी म्हटले आहे. पाऊस मोठा नसला तरी जोरदार वारा आणि ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट यामुळे नागरिकांना घरातून बाहेर पडणे मुश्किल झाले होते. अशा परिस्थितीत पावसाने शहर परिसरात चांगले झोडपून काढले आहे.

अशाच प्रकारे सातत्याने पाऊस सुरू असल्यास येत्या काळात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. भाजीपाला मी करणाऱ्या शेतकऱ्यांचे सध्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून येत्या काळात हा पाऊस कमी व्हावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त होत आहे. सध्या मशागतीसाठी हा पाऊस पोषक ठरला असला तरी इतर कामांसाठी हा पाऊस नुकसानदायक आहे. पडलेल्या पावसामुळे मात्र अनेकांची तारांबळ उडाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.