Saturday, April 20, 2024

/

मार्कंडेय” कडून सर्व शेतकऱ्यांची ऊस बिले अदा : अविनाश पोतदार

 belgaum

गेल्या वर्षीच्या चांचणी गळीत हंगामातील शेतकऱ्यांच्या उसाची बिले मार्कंडेय साखर कारखान्याकडून अदा करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अविनाश पोतदार आणि कार्यकारी संचालक एमडी मल्लुर यांनी दिली आहे.

मार्कंडेय साखर कारखान्याचा मागील वर्षीचा हंगाम हा चांचणी हंगाम होता तरीदेखील कारखान्याने 72 हजार टन उसाचे गाळप केले आहे. यासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आणि सभासदांनी कारखान्याला ऊस पुरवठा करून सहकार्य केले केले आहे. आगामी गळीत हंगामासाठी लागणारी आवश्यक सर्व तयारी मार्कंडेय साखर कारखान्याकडून करण्यात येत आहे. या वर्षीच्या गळीत हंगामामध्ये जास्तीत जास्त उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट संचालक मंडळाने निश्चित केले आहे त्यानुसार सर्व संचालक आत्तापासूनच कार्यरत झाले आहेत, असे अविनाश पोतदार यांनी सांगितले.

राज्याचे साखर कामगार मंत्री शिवराम हेब्बार यांनी अलीकडेच एका बैठकीमध्ये कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या उसाची बिले जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी लवकरात लवकर अदा करावीत अशी सूचना केली होती. त्यानुसार मार्कंडेय साखर कारखान्याने मागील वर्षीच्या गळीत हंगामातील शेतकऱ्यांची उसाची बिले अदा केली आहेत. तेंव्हा यंदाच्या गळीत हंगामासाठी शेतकरी आणि सभासदांनी कारखान्याला जास्तीत जास्त ऊस पुरवठा करून निर्धारित उद्दिष्ट गाठण्यास सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन अविनाश पोतदार आणि संचालक मंडळाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.