Tuesday, April 16, 2024

/

“ती” अतिक्रमीत जमीन परत मिळवून द्या : बिजगर्णी ग्रामस्थांची मागणी

 belgaum

का विशिष्ट समाजातील कांही लोकांनी अतिक्रमण करून ताब्यात घेतलेली आपल्या गावाची गायरान जमीन पुन्हा गावाला परत मिळवून द्यावी, अशा मागणीचे निवेदन बिजगर्णी (ता.बेळगाव) येथील ग्रामस्थांनी नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे.

ब्रिटिशांच्या काळातील नियमाप्रमाणे तत्कालीन सरकारने 72 एकर गायरान बिजगर्णी गावाच्या नांवाने केली आहे. तेंव्हापासून गावातील गुरे चारण्यासाठी या जमिनीचा वापर केला जातो. परंतु गेल्या कांही वर्षापासून एका विशिष्ट समाजातील लोक या जमिनीत अतिक्रमण करून शेती करत आहेत.

यासंदर्भात तक्रार करून देखील ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष केले जात असल्यामुळे 2004 साली ग्रामस्थांना नाईलाजाने न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार 2017 साली न्यायालयाने ग्रामस्थांच्या बाजूने खटल्याचा निकाल दिला आहे. तथापि अद्यापपर्यंत गायरान जमिनीतील अतिक्रमण हटवून संबंधित जमीन गावाच्या ताब्यात देण्यात आलेली नाही.

 belgaum

तेंव्हा जिल्हा प्रशासनाने याप्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित अतिक्रमित गायरान जमीन पुन्हा गावाला परत मिळवून देण्यासंदर्भात संबंधित खात्याला आदेश द्यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन सादर करतेवेळी मल्लाप्पा बेळगांवकर, दामू मोरे, ज्योतिबा मोरे, वसंत अष्टेकर, आदींसह बहुसंख्य बिजगर्णी ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.