सदस्य सुगीच्या हंगामात शेतकरी गुंतला असताना पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता लागून राहिली आहे. त्यामुळे आता सुगीच्या कामात खोळंबा निर्माण होणार असून शेतकरी पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या वर्षी आलेल्या महापुरामुळे पहिला शेतकऱ्यांना फटका बसला आहे. त्यानंतर आता पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण होत असून वारंवार होत असलेल्या पावसाचा फटका शेतकर्यांना सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कुणाकडे पहावे अशी आशा साऱ्यांना लागून आहे. मुख्यत सुखी हंगाम जोमाने सुरू होते. मात्र आता पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.
पूर परिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. त्यातून सावरत शेतकरी सुगी कामात व्यग्र होता. यापूर्वीही पावसाने सुगीवर अवकळा आणली होती. मात्र पुन्हा वातावरण स्वच्छ झाल्याने शेतकरी कामात गुंतला होता. आता पुन्हा गुरुवारी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी मागण्या ओळखण्यात गुंतला आहे.
सध्या बेळगाव आणि ग्रामीण भागात जोरदार सुगीच्या कामाला सुरुवात झाली आहे. मळणी करणे तसेच पिंजर सुव्यवस्थित ठेवणे यासह इतर कामे शेतकरी करू लागला आहे. मात्र गुरुवारी निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे मोठी समस्या निर्माण होणार अशी भीती शेतकर्यांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे जर पाऊस आला तर अनेक भात पीक खराब होणार आहेत. त्यामुळे आणखी काही दिवस पाऊस नको रे बाबा अशीच मागणी शेतकरी करू लागले आहेत.