Saturday, April 27, 2024

/

बेळगावचे स्मार्ट रस्ते शास्त्रोक्त नाहीत

 belgaum

सध्या स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत काँक्रीट रस्ते करण्याचे काम जोरात सुरू आहे.हे रस्ते झाल्यावर खड्डयांची समस्या मिटेल या आनंदात बेळगावकर आहेत.पण या काँक्रीट रस्त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी होणार असून काही काळाने भूगर्भातील पाण्याची पातळी खालावेल अशी भीती भूगर्भातज्ज्ञ सागर वाघमारे यांनी व्यक्त केली आहे.

अलीकडच्या काळात शहर आणि परिसरात बांधकामे मोठ्या प्रमाणावर झाली आहेत.बांधकाम करताना सगळीकडे काँक्रीट घालण्यात आले आहे.त्यामुळे तेथेही पावसाचे पाणी भूगर्भात जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.नाल्यांचे देखील काँक्रीटीकरण करण्यात आल्यामुळे पावसाळ्यातील पाणी तेथे भूगर्भात जाण्याची शक्यता कमी आहे.

Sagar waghmare
Sagar waghmare

यापूर्वी देखील अनेक गावातील अभ्यास करण्यात आला असून काँक्रीटचे रस्ते केलेल्या भागातील भूगर्भातील पाण्याची पातळी काही काळाने खूप खालावल्याचे अहवाल समोर आले आहेत.नवी इमारत बांधतात त्यांना वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प बसविण्याचा नियम करण्यात आला आहे पण त्याची अंमलबजावणी होत नाही.म्हणून काँक्रीटचे रस्ते आणि इमारत बांधताना सगळीकडे केल्या जाणाऱ्या काँक्रीटीकरणाचा धोका लक्षात घेतला पाहिजे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.