Sunday, April 28, 2024

/

पावसामुळे भाजीपाल्यावर विपरीत परिणाम

 belgaum

यावर्षी पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावून अनेकांना उघड्यावर टाकले आहे. तर अनेकांचे संसार आलेल्या पुरामुळे वाहून गेले आहेत. याचा फटका सर्वत्रच बसू लागला आहे. सध्या अजूनही पावसाळा सुरू असल्याचा अनुभव येत असून या पावसामुळे भाजीपाल्यावर याचे परिणाम होत आहेत.

नवरात्र उत्सव संपला तरी अद्याप पावसाळा संपलेला नाही. याचा परिणाम भाजीपाल्यावर होत असून आवक रोडावली. यामुळे घाऊक बाजारातच सर्व भाज्या सरासरी 20 ते 50 पर्यंत गेले आहेत. पावसामुळे माल खराब असल्याची तक्रार विक्रेत्यांकडून ऐकावयास मिळत आहे. त्यामुळे अजूनही काही दिवस असाच पावसाचे राहिला तर शेतात भाजीपाला कुजण्याची शक्यता नाकारता येत नाही.

bhajipala-sabji

 belgaum

यावर्षी प्रचंड प्रमाणात पाऊस पडून पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यात मुख्य पिके वाहून गेली आहेत तर काही पिके खराब झाली आहेत तर काही शेतकऱ्यांनी तेच पीक उशीराने घेतले आहे. अजूनही काही भागात पाऊस असल्याने याचा फटका पिकांना बसला आहे. याबाबत व्यापाऱ्यांशी चर्चा केली असता आधीची अतिवृष्टी व आताच्या लांबलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका फळभाज्या वर बसला आहे. कर्नाटकातील इतर भागातील मार्ग खराब असल्याने बेळगाव परिसरातही काही प्रमाणात भाजीवर याचा परिणाम झाल्याने दर वाढण्याची शक्यता आहे, असे सांगण्यात येत आहे.

भाज्यांची आवक व किमतीवर परिणाम होत असल्याने विक्रेते व ग्राहकांनाही याचा फटका बसू लागला आहे. बेळगाव येथील भाजीपाला महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकात यासह इतर भागातही जातो. मात्र यावर्षी पावसामुळे याला मोठा फटका बसला असून इतर राज्यात भाजीपाला जाणे देखील काही प्रमाणात कमी झाला आहे. पूरपरिस्थिती वेळी तसा पाऊस पडत होता तसा पाऊस नसला तरी अजूनही ढगाळ वातावरण आणि अधून-मधून सरी येत असल्याने शेतातून भाजीपाला काढणे कठीण होत आहे. तर काही भाजीपाला शेतातच खराब होत आहेत. त्यामुळे आवक कमी झाली असून विक्रीवर याचा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.