खानापूर तालुक्यातील निटूर येथील दोघेजण गोव्यात अपघातात ठार
खानापूर तालुक्यातील निट्टूर येथील युवक भीमाना रवळू गणेबैलकर( वय 24 )तसेच राहुल शंकर मनोळकर ( वय 22 ) मूळ संगरगाळी सद्या राहणार निटूर या दोघांच्या दुचाकीला गोव्यातील ऊसगावजवळील साखर कारखान्याजवळ एका टिप्परने धडक दिल्याने अपघाती निधन झाले.
मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली.
हे दोघे युवक आपल्या स्कूटीवरून विटांचे पैसे वसूल करण्यासाठी गोव्याला गेले होते. अनमोड मार्गाने ते खानापूरकडे परत येत असताना धारबांदोडानजीक टिप्परने त्यांना जोराची धडक दिल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन जागीच ठार झाले.
मयत भिमांना व राहुल हे दोघे विटांचा व्यवसाय करत होते. नुकताच त्यांनी गोव्यामध्ये विटांचे तुकडे व विटा पोहोचविल्या होत्या. त्याचे पैसे आणण्यासाठी ते आज सकाळी गोव्याला गेले होते. हे दोघे आपल्या दुचाकीवरून अनमोड मार्गे परत येताना त्यांच्यावर क्रूर काळाने घाला घातला. सदर घटनेची धारबांधोडा पोलीस स्थानकात नोंद झाली असून त्यांचे मृतदेह गुरुवारी सकाळी गावी आणण्यात येणार आहे.
मयत राहुल हा मूळचा संगरगाळीचा आहे, तो निट्टूर येथे मामाच्या गावी राहत होता. दोघांच्या अपघाती निधनाने निटूर व संगरगाळी गावात एकच शोककळा पसरली आहे.भीमाणा याच्यावर निट्टूर येथे तर राहुल याच्यावर मूळ गावी संगरगाळी येथे उद्या बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.भीमाण्णा याच्या पश्चात आई, वडील, भाऊ दोन बहिणी असा परिवार आहे. तर राहुल याच्या पश्चात आई, वडील व भाऊ असा परिवार आहे.