Thursday, April 25, 2024

/

केंद्रीय मंत्रीपदाचा कसा असतो दर्जा?

 belgaum

केंद्र सरकारच्या काल झालेल्या कॅबिनेट विस्तारात कर्नाटकातील चार नवीन खासदारांना मंत्री बनवण्यात आले आहे. नूतन चारही मंत्री राज्यमंत्री दर्जाचे आहेत.त्यामुळे एकूण मंत्रिमंडळात कर्नाटकातून एक कॅबिनेट प्रहलाद जोशी व्यतिरिक्त काल शपथ घातलेले राज्यमंत्री आहेत. राज्य मंत्री कॅबिनेट आणि स्वतंत्र प्रभार यातील फरक काय आपण जाणून घेऊयात

कॅबिनेट मंत्री(cabinet minister), राज्यमंत्री(mos) आणि राज्यमंत्री अतिरिक्त प्रभार(mos independant charge) अशा तीन प्रकारात मिळणाऱ्या मंत्रिपदाचा दर्जा काय असतो? याची माहिती बेळगाव live च्या वाचकांना आम्ही उपलब्ध करून देत आहोत.

पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट स्थापन केले जाते. त्यामध्ये कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश असतो. देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेत असताना कॅबिनेटची बैठक पंतप्रधान घेतात. त्या बैठकीला उपस्थित राहण्याचा मान कॅबिनेट मंत्र्यांना मिळतो .कॅबिनेट दर्जाचे मंत्री पद हे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारे असते. मिळेल त्या मंत्रालयाचा त्यांच्याकडे संपूर्ण प्रभार असतो. आणि आपल्या मंत्रालयातील निर्णय घेण्यास पूर्ण अधिकार कॅबिनेट मंत्र्यांना दिलेला असतो. त्याच प्रकारे प्रत्येक किंवा काही कॅबिनेट मंत्र्यांच्या हाताखाली दोन राज्यमंत्री दिले जातात. हे राज्यमंत्री स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकत नसले तरी आपल्याला घ्यावयाच्या निर्णयासंदर्भात कॅबिनेट मंत्रीकडे प्रस्ताव सादर करून तसा निर्णय करून घेण्याची क्षमता त्यांच्याकडे असते.

 belgaum

हे राज्यमंत्री कॅबिनेट दर्जाच्या कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहू शकत नाहीत. त्यांना तो अधिकार नसतो मात्र वैयक्तिक कॅबिनेट मंत्र्यांनी आपल्या मंत्रालय संदर्भात निर्णय घेण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या बैठकीत संबंधित राज्यमंत्र्यांना सामावून घेतले जाते .

Sansad

आणखी एक राज्यमंत्री अतिरिक्त प्रभार किंवा स्वतंत्र प्रभार दिला जातो. त्या राज्यमंत्र्यांना संबंधित मंत्रालयाचा व्यक्तिगत निर्णय घेण्याचा अधिकार असतो, मात्र त्यासाठी आवश्यक निधी त्या मंत्रालयाकडे आहे की नाही यावर त्या मंत्र्याला कितपत निर्णय घेता येतात ते शक्य होते.
त्यामुळे राज्यमंत्री आणि राज्यमंत्री प्रभार ही मंत्रीपदे महत्वाची असली तरी निर्णय घेण्यासाठी इतरांवर अवलंबून असतात.

कॅबिनेट मंत्री स्वतःचे निर्णय स्वतः घेऊन ते पंतप्रधानांसमोर मांडू शकतात. देशाच्या विकासासाठी हातभार लावू शकतात. राज्यमंत्री आपल्याला आवश्यक वाटणारे निर्णय कॅबिनेट मंत्री समोर मांडून देशाच्या विकासाला हातभार लावू शकतात. केंद्र सरकारमध्ये मंत्रीपद मिळणे ही सन्मानाची गोष्ट आहे. सर्व प्रकारच्या सरकारी सुविधा आणि इतर आवश्यक सुरक्षा त्यांना पुरवली जाते. या यंत्रणेचा लाभ स्वतः घेतानाच ज्या कारणासाठी आपण मंत्री झालो आहे ते कारण सतत लक्षात ठेवून त्यांनी काम करावे .हीच जनतेची आणि सरकारची अपेक्षा असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.