Saturday, April 20, 2024

/

मार्कंडेयबरोबर आता हिरण्यकेशीलाही दूषित पाण्याचा धोका

 belgaum

बेळगाव उत्तर भागातील प्रमुख नदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडेय नदीबरोबर आता हिरण्यकेशी नदीचेही पावित्र्य धोक्यात आलेे आहे. संकेश्वर येथील हिरा शुगर्स कारखान्यांतून दूषित पाणी या नदीपात्रात सोडण्यात आल्याने यापुढे हा धोका नागरिकांच्या जीवावर बेतणार आहे. त्यामुळे गडहिंग्लज आणि आजरा भागातून याला विरोध होत असल्याचे दिसून येत आहे.

हिरा शुगर्स कारखान्याचे मळीमिश्रीत पाणी ओढ्यातून हिरण्यकेशी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे हिरण्यकेशी काठावरील गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या नदीतील पाणी काळपट पडले असून परिसरात दुर्गधी पसरली आहे. याचा विचार मात्र कोणत्याही लोकप्रतिनिधीने केला नसून लक्ष दिले नसल्याचे दिसून येत आहे.

हा प्रकार मागील अनेक वर्षापासून घडत आहे. हिरण्यकेशी या नदीवर गडहिंग्लज, आजरा तालुका अवलंबून आहे. मात्र यावर्षी याचा अधिकच परिणाम दिसून येत आहे. या नदीवर तेथील अनेक शेतकरी अवलंबून असून हे मळीमिश्रीत पाणी नदीत सोडल्याने शेतीची वाताहत होत आहे. मात्र अजूनही शेतकरी वर्गाने निवेदन आणि इतर मार्गाने आपला लढा सुरूच ठेवला आहे. शेतकरी कधी आक्रमक होऊन रस्त्यावर उतरतील हे सांगणे कठीण आहे.

हा कारखान्याच्या पाण्याचा फटका जसा महाराष्ट्र ला बसतो तसाच संकेश्वर, गोटूरे, हेब्बाळ, चिखलगुड या गावांनाही बसत आहे. त्यामुळे यापुढे तरी याचे गांभीर्य लक्षात घेऊन जोरदार आंदोलन करण्याची गरज निर्माण झाली आहे. हा कारखाना बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.