Tuesday, April 16, 2024

/

जारकीहोळी ब्रदर्स फेल

 belgaum

माजी केपीसीसी सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते शंकर मूनवळी यांनी निवडणुकीनंतर जारकीहोळी बंधूंवर टीकास्त्र सोडले आहे. राजकीय इच्छा पूर्ण करण्यात ते अपयशी झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
गोकाक आणि यमकनमरडी येथील स्वतःच्या जागांवर निवडून येतानाही त्यांना अथक परिश्रम करावे लागले.
जिल्ह्यात काँग्रेसच्या १२ जागा निवडून आणू असे सांगून फक्त आठ निवडून आल्या. हे बंधू व्यापारी आहेत, सामाजिक प्रश्नाशी त्यांना देणेघेणे नाही. यामुळे त्यांना जनतेने धडा शिकवला आहे. असा आरोपही त्यांनी केला.

 

जारकीहोळी बंधूना जे डी एस कॉग्रेसच्या युती सरकारच्या मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेऊन नये त्यांच्या एवजी लक्ष्मी हेब्बाळकर,अंजलीताई निंबाळकर आणि गणेश हुक्केरी यांचा मंत्री मंडळात समावेश करावा अशी देखील त्यांनी मागणी केली आहे. मंत्री डी के शिव कुमार यांना उपमुख्यमंत्री करा अशी देखील मागणी मुनवळळी यांनी पत्रकार परिषदे द्वारे केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.