Friday, April 19, 2024

/

साड्या वाटून निवडणूक जिंकता येत नाही जारकीहोळींची लक्ष्मीवर बोचरी टीका

 belgaum

Laxmi vs satish१०० रुपयांच्या १०००० साड्या वाटल्या म्हणून निवडणूक जिंकता येत नाही अशी बोचरी टीका सतीश जारकीहोळी यांनी आपल्याच पक्षातल्या लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर केली आहे.
सतीश जारकीहोळी समर्थकांनी आज जारकीहोळी यांचा सत्कार आयोजित केला होता,त्या कार्यक्रमात बोलत होते.
दिल्लीत एक बंगळुरात एक आणि बेळगावात एक नेता ठेऊन यावेळेस राजकारण करता येत नाही.
तुम्ही 100 रुपयांच्या 10 हजार साड्या वाटल्या तर लोक तुम्हाला मतदान करत नाहीत तुम्ही जर 100 च्या साड्या वाटल्या तर मी 200 रुपयांच्या वाटतो अशी खोचक टीका केली आहे.
AICC सचिव झाल्यानंतर ग्रामीण काँग्रेस ने सतीश यांचा सत्कार केला नव्हता आज समर्थकांनी त्यांचा सत्कार केला त्यावेळी हे बोलत होते.
या टिके नंतर पुन्हा एकदा बेळगाव कॉंग्रेस मध्ये वातावरण संघर्षमय आहे, हेच स्पष्ट झालं आहे
माझं काम बघून मला AICC सचिव आणि राज्य प्रभार देण्यात आला आहे तिथे देखील मी चांगलंच कार्य करीन बेळगाव च नाव वर करीन सत्ता शाश्वत नसून जनतेचा विश्वास मुख्य आहे असं देखील ते म्हणाले .
गेल्या 20 वर्षा पासून आंबेडकरांचे विचार आणि तत्व सांगत आलोय 300 वर्षा नंतर लिंगायत कॉंग्रेस कडे आलेत,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.