Saturday, April 27, 2024

/

चुकीच्या पद्धतीनं कार पार्किंग केल्याचा फटका, चंदगड तालुक्यातील एकट्याने गमावला जीव

 belgaum

Traffic jam accident

तिपदरी महामार्गावर चुकीच्या पद्धतीने कार थांबवून तिचा दरवाजा बेजबाबदारपणे उघडणाऱ्या एकाच्या मूर्खपणा ने रस्त्याने निघालेल्या दुसऱ्याचा जीव घेतला आहे, गांधीनगर नजीक महामार्गावर हि घटना घडली आहे.
महामार्गाच्या मधोमध कर थांबवून दरवाजा उघडला गेला, मागून मोटोरसायकल ने येणाऱ्यांची धडक त्या दरवाज्याला बसली, यामुळे तो रस्त्यावर पडला आणि मागून येणारी बस त्याच्या डोक्या वरून गेल्याने जागीच गतप्राण झाला आहे.
सुदैवानेच मोटोरसायकल वरील त्याची पत्नी आणि मुले वाचली आहेत.
डोक्याला हेल्मेट नसल्याने त्याचा मृत्यू झाला. एकूणच सुरक्षेबाबत जबाबदार पणाचा अभाव दिसून येत असून, त्यातून दुर्दैवी घटना घडत आहेत. कधी बेळगावकर जनतेला शिस्त येणार हा प्रश्न उठत आहे
राजू मारुती पाटील असे या मृतक दुचाकी स्वराच नाव असून त्याची मुलं आणि पत्नी जखमी झाली आहेत. राजू पाटील हा  मूळचा चंदगड तालुक्यातील ढेकोळी गावचा रहिवाशी आहे.घटना स्थळी गांधी नगर जवळ बराच काळ ट्राफिक जॅम झाला होता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.