बेळगाव प्रश्नी सुप्रीम कोर्टातील याचिकेत लक्ष घालुन ताकतीन लढू असं ठोस आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमा प्रश्नी तज्ञ समिती बैठकीवेळी दिल आहे.
मुंबई मुक्कामी बुधवारी तज्ञ समिती बैठकीच आयोजन करण्यात आलं होतं. बेळगाव प्रश्नी सुप्रीम कोर्टातील कामकाजाचा आढावा घेत घेण्यात आला पुढील तारीख लवकर घेण्यासाठी प्रयत्न करण्याबद्दल चर्चा करण्यात आली.समन्वयक मंत्री चंद्रकांत दादा पाटील, जेष्ठ नेते एन डी पाटील यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते.
बेळगावातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळान सिल्वर ओक येथे केंद्रिय कृषी मंत्री शरद पवार यांची भेट घेऊन सविस्तर देखील चर्चा केली .या शिष्ट मंडळात दिनेश औउळकर,राजाभाऊ पाटील प्रकाश मरगाळे, दीपक दळवी, आमदार अरविंद पाटील, दिगंबर पाटील सुनील आनंदाचे आदी उपस्थित होते.