Friday, April 26, 2024

/

पी ओ पी बद्दल गणेश महामंडळ संभ्रमात, रविवारी पुन्हा बैठक

 belgaum

बेळगाव दि ५-प्लास्टर ऑफ परीस च्या गणेश मूर्ती बंदी विरोधात काही संघटना मंगळवारी (७ रोजी)मोर्चा काढणार आहेत पण या प्रश्नी सर्वकष विचार करूनच निर्णय घेण्यात येणार आहे लवकरच पालक मंत्री रमेश जारकीहोळी यांची भेट घेण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या महा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.महामंडळाच्या भूमिकेवर चर्चा करण्यासाठी आज पुन्हा गणेश मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

प्लास्टर ऑफ परीस च्या गणेश मूर्ती वर बंदी आणल्याने पर्यायी म्हणून शेडू च्या मूर्ती बाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.गणेश महा मंडळ इतकी वर्ष सेवा करत असताना मूर्ती कराना गणेश मंडळाच्या वतीने जानेवारी महिन्यात पी ओ पी मूर्ती करा अशी सूचना दिली होती ज्यावेळी सरकर कारवाई करेल तेंव्हा गणेश मंडळ पुढ येईल अस आश्वासन दिल असताना मोर्चा काढणे कितपत योग्य आहे असा सूर देखील बैठकीत ऐकायला मिळाला. यावेळी रमाकांत कोंडुसकर यांनी पी ओ पी मूर्ती होणे गरजेचे असून मोर्चा सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन केल्या वर मदन बामणे यांनी जर का मोर्चा राजकारण विरहीत असेल जर का मोर्चा च नेतृत्व कोण्या राजकारण्यांनी करू नयेन पाच गणेश भक्तांच्या हस्ते निवेदन देण्यात याव कोणीही त्या ठिकाणी भाषण करू नये असा पर्याय सुचविल्यावर कोंडुसकर यांनी याबाबत विचार करण्यात येईल अस सांगितले .

मूर्तीकरा सोबत माझी बैठक झाली होती त्यावेळी मी पी ओ पी मूर्ती तुम्ही तयार करा पुढच मी बघू घेईन असा मूर्तीकारांना शब्द दिला होता परंतु आम्हाला न विश्वासात घेता काही जणांनी बैठकांच सत्र सुरु केल आहे यामुळे   सर्व बाबांचा विचार करून निर्णय घेऊ असआमदार  संभाजी पाटील म्हणाले .

 belgaum

खानापूर येथील मूर्तिकार शेडू च्या मूर्ती बनवण्यास तयार असून बेळगाव शहरात त्यांना जागा उपलब्ध करून ध्यावी  अशी खानापूर येथील उपस्थित गणेश मुर्तीकारा नी बैठकीत मागणी केली .ganesh maha mandal bgm

1 COMMENT

  1. खानापूरचे मूर्तीकार शाडूच्या मूर्ती तयार करण्यासाठी जागा मागत असतील तर मनपाने कांही अटीवर त्वरित जागा द्यावी.जर त्यानां शाडूच्या मूर्त्या बनवता येतात तर इथल्या मूर्तिकारांना काय अडचण आहे ? कि पूढे 2018 ला विधानसभा निवडणुकीत याच राजकारण करण्यासाठी मोठेपणा मारायच राजकारण करायच आहे ? अस त्यांना वाटत असेल तर जनता तूमची अशी कूटनिती कारस्थान भूईसपाट करतील येवढी जनता आता शहाणी झाली आहे हे बेळगावमधे झालेल्या मराठा क्रांती मोर्चाने दाखवून दिलय.
    दुसर कारण म्हणजे धोक्याची भिती लक्षात घेऊन सार्वजनिक गणेश मंडळ आपोआपच मूर्त्या लहान बनवायला सूरु करतील त्यामुळे प्रदूषण, पाण्यातील जिवजंतू वाचत शुध्दताही राहिल याचा अभ्यास यांना कधी होणार ? आणी याआधी हे मूर्तीकार शाडूच्या मूर्त्या बनवत होते तर आताच कोणती अडचण आहे याचा विचार करणार कि नाही ? फक्त जनतेच्या नजरेत राहण्यासाठी राजकारण करु नका.जनतेच्या अनेक गंभीर समस्या आहेत त्या शोधा त्या सोडवण्याचा निश्वार्थपणे प्रामाणीक प्रयत्न करा.येवढीच अपेक्षा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.