बेळगाव लाईव्ह :गोव्याने आयात केलेल्या भाज्यांवरील अवलंबित्व 25 टक्के कमी केले आहे आणि बेळगावहून गोव्याला सुमारे 10 टक्के भाज्या, फळे आणि दुधाची निर्यात सुरू केली आहे, असा दावा केला जात असताना दुसरीकडे गेल्या काही वर्षांत गोव्याला होणाऱ्या भाज्यांच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही असा दावा बेळगावमधील घाऊक भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी केला आहे.
गोव्याच्या भाजी पुरवठ्याबद्दल बोलताना व्यापाऱ्यांनी सांगितले की बेळगावातील भाज्यांची मागणी तशीच आहे आणि सणांच्या काळातही त्यात मोठी वाढ झाली आहे. बेळगावातून येणारे दूध आणि फळांचा पुरवठाही गोव्याच्या बाजारपेठेत वर्चस्व गाजवत आहे. तसेच गोव्याला होणारा पुरवठा वाढवण्यासाठी संघटित प्रयत्न सुरू आहेत. बेळगावमध्ये दोन घाऊक भाजीपाला बाजारपेठा आहेत जिथून गोवा आणि महाराष्ट्राच्या काही भागांना आणि उत्तर कर्नाटकला भाज्यांचा पुरवठा केला जातो.
पहिली म्हणजे उत्तर बेळगावमधील कंग्राळी जवळील सरकार नियंत्रित कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) घाऊक बाजारपेठ आणि दुसरी म्हणजे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग 748 वर बेळगावच्या पूर्वेकडील सुमारे 4 वर्षांपूर्वी सुरू झालेले जय किसान घाऊक भाजीपाला बाजारपेठ. बटाटे आणि कांदे एपीएमसीमधून पुरवले जातात तर इतर सर्व भाज्या जय किसान घाऊक भाजीपाला बाजारपेठेतून पुरवल्या जातात. “गोव्यातील शेतकऱ्यांनी किती भाज्या पिकवल्या आहेत हे आम्हाला माहिती नाही, परंतु बेळगावमधील भाज्यांची मागणी कमी झालेली नाही.” दररोज भाजीपाला वाहून नेणारी सरासरी 78 वाहने गोव्यात पाठवली जातात आणि यामध्ये गोव्याच्या फलोत्पादन महामंडळाच्या वाहनांचा समावेश आहे. खरं तर, येणाऱ्या श्रावणाच्या चौथ्या आणि त्यानंतर येणाऱ्या सणांच्या हंगामात ही मागणी आणखी वाढण्याची अपेक्षा आहे,” असे गोव्याचे प्रमुख घाऊक पुरवठादार ज्योतिबा पाटील यांनी सांगितले. गोव्यात शेतकरी भाजीपाला लागवड करतात त्यावेळी उन्हाळ्यातही पुरवठ्यावर परिणाम होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बटाटा आणि कांद्याच्या घाऊक विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार गोवा हे कांदे आणि बटाट्याच्या पुरवठ्यासाठी बेळगाववर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. फळांच्या बाबतीतही परिस्थिती कांही वेगळी नाही. घाऊक फळ पुरवठादारांनी सांगितले की, ते दर बुधवारी आणि शनिवारी प्रत्येक फळाच्या सुमारे 20 पेट्या गोव्यात पाठवतात. सणांच्या काळात विशेषतः ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या काळात ही मागणी वाढते. बेळगावमध्ये पिकवल्या जाणाऱ्या भाज्यांच्या मागणीचे समर्थन करत व्यापाऱ्यांनी सांगितले की, बेळगाव प्रदेशातील भाज्या गोवा आणि प्रदेशातील इतर कोणत्याही भागात पिकवल्या जाणाऱ्या भाज्यांपेक्षा चविष्ट असतात. गोव्यात पिकवल्या जाणाऱ्या भाज्या हवामान आणि मातीच्या परिस्थितीमुळे तितक्या चवदार नसतात. बेळगावच्या शेतात पिकवल्या जाणाऱ्या भाज्या इतर कोणत्याही भागांपेक्षा चविष्ट असतात. त्यामुळे बेळगावातील भाज्यांना जास्त मागणी असते. बेळगावमधील माती आणि अंतर्गत भागातील थंड हवामानामुळे भाजीपाला लागवडीला अनुकूल परिस्थिती निर्माण होते, असे घाऊक विक्रेते उमेश पाटील म्हणाले. गोव्याला होणारा पुरवठा स्थिर असला तरी उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रातील बाजारपेठांमध्ये मागणी वाढत असून जिथे शेतकऱ्यांना गोव्यापेक्षा चांगला दर आणि जलद पैसे मिळत आहे. व्यापाऱ्यांनी असा दावा केला की गोव्यात फक्त काही भाज्या पिकवल्या जातात आणि त्याही उन्हाळ्यात मर्यादित कालावधीसाठी 3 -4 महिने असतात. या काळात बेळगावमधून होणाऱ्या पुरवठ्यावर परिणाम होत नाही.
तरुण उद्योजक आदित्य पाटील यांनी एका नवीन ट्रेंडला सुरुवात केली आहे. ज्याद्वारे शेतकऱ्यांनी थेट गोव्याला चांगल्या दराने भाज्यांचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. कडोली, बेन्नाळी, आंबेवाडी, बागेवाडी आणि इतर भागातील शेतकऱ्यांनी सांगितले की, गोव्यातील काही व्यापारी त्यांच्या शेतांना भेट देऊन बेळगावमधील घाऊक भाजीपाला बाजारापेक्षा चांगला दर देऊन गोव्यात विक्रीसाठी भाज्या खरेदी करत आहेत. तथापी आम्ही या थेट खरेदीवर पूर्णपणे अवलंबून राहू शकत नसल्यामुळे आम्हाला अजूनही जय किसान घाऊक बाजारावर अवलंबून राहावे लागते.
दरम्यान, गोव्याला होणाऱ्या दुधाच्या पुरवठ्याचा अभ्यासही संघटित आणि असंघटित क्षेत्रातून करण्यात आला आहे. कर्नाटक दूध महासंघाचा एक भाग असलेल्या बेळगाव दूध संघ (बीईएमयूएल) दररोज गोव्याला सुमारे 25,000 लिटर दूध पुरवतो. आमच्या दीर्घायुषी असलेल्या गुडलाइफ दुधालाही गोव्यात जास्त मागणी आहे, असे बेमुलचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत म्हणाले. गोव्यात नंदिनी दुधाला जोरदार प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.
न्युज सोर्स : गोवन वार्ता