Sunday, April 28, 2024

/

येळळूर रेल्वे लाईन शिवारातील 11 भाताच्या गंज्या जाळल्या

 belgaum

बेळगाव लाईव्ह: बेळगाव तालुक्यातील मच्छे जवळील येळळूर रेल्वे लाईन शिवारात एका रात्रीत अकरा भात पिकाच्या आणि एक गवताच्या गंजीना आग लावण्याचा प्रकार घडला आहे.

अज्ञातांनी लावलेल्या आगीत भस्मसात झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे भात आगीत जळून खाक झाले आहे. या घटनेने बेळगाव तालुक्यातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. गुरुवारी रात्री ही घटना घडली आहे. रात्री दहाच्या सुमारास शेतकऱ्यांच्या निदर्शनास ही घटना येताच ग्रामीण पोलिसांना कळवून अग्निशामक दलाच्या गाड्या बोलावण्यात आल्या मात्र तोवर सर्व गंजी जळून खाक झाल्या होत्या.

शिवारात मळणीसाठी घातलेल्या बासमती भात पिकाच्या 11 गंजी तर एक मळणी झालेली गवताची या अज्ञातांनी लावलेल्या आगीत भस्मसात झाली आहे.

 belgaum

यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने अगोदरच दुष्काळ आहे भात पीक कमी प्रमाणात झालेला आहे आणि केवळ बासमती भाताचा उत्पादन बऱ्यापैकी झालेले आहे अश्यात इतक्या मोठ्या प्रमाणात अज्ञातांनी भात पिकाच्या गंजी जाळल्याने येळळूर परिसरातील शेतकऱ्यात मोठ्या प्रमाणात भीती पसरली असून शेतकऱ्यांनी शिल्लक असलेल्या भाताच्या मळणी तात्काळ करून घेतल्या आहेत.Yellur

या भाताच्या जळालेल्या गज्यांची नुकसाभरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी वाढू लागली आहे. जळालेल्या भात पिकाच्या 9 गंज्या येळळूर येथील शेतकऱ्यांच्या तर 3 मच्छे येथील शेतकऱ्यांच्या मालकीच्या आहेत.

या प्रकरणी ग्रामीण पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली असून शिवारातील भात पिकाची गंजी जाळणाऱ्यांचा शोध पोलिसांनी घ्यावा अशी मागणी आहे याशिवाय शासनाने तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशीही मागणी होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.