Wednesday, May 15, 2024

/

भारतीय संविधान जगात सर्वश्रेष्ठ -मंत्री जारकीहोळी

 belgaum

बेळगाव लाईव्ह:भारतीय राज्यघटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला समानता, न्याय व स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. भारतीय संविधान अर्थात राज्यघटना ही जगातील सर्वश्रेष्ठ घटना मानली जाते, असे विचार राज्याचे बांधकाम आणि जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले.

शहरातील बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये आज रविवारी सकाळी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. सरकारच्या निर्देशानुसार दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांसह शाळा -कॉलेजीसमध्ये संविधान दिन साजरा केला जातो. प्रत्येक सरकारी कार्यक्रमांमध्ये संविधान वाचन केले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये सामाजिक न्याय आणि समानतेच्या मूल्यांचा समावेश करून देशातील नागरिकांचे जीवन सुकर केले. तीनशे हे पानांपेक्षा अधिक असलेल्या संविधानाद्वारे सामाजिक, आर्थिक, धर्म, श्रद्धा, उपवास, स्वातंत्र्य, न्याय, मान हे अधिकार आपल्याला दिले आहेत. संविधान निर्माण होण्यापूर्वी देशाची परिस्थिती गंभीर होती.

अनेक देशांमध्ये भ्रमंती करून असंख्य पुस्तके वाचून सर्व परिस्थितीचे अवलोकन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती केली आहे. भारत हा सार्वभौम जाती भेदापलीकडे जाणारा, मानणारा देश आहे. महिलांना उद्योग, पूर्वजांच्या संपत्तीमध्ये वाटा, देशातील प्रत्येकाला सक्तीचे शिक्षण, समानतेचा हक्क संविधानामुळे मिळाला आहे. डाॅ. आंबेडकर यांना एकाच जातीपुरते सीमित करून चालणार नाही. त्यांनी संविधानाची रचना देशातील सर्व नागरिकांसाठी केली आहे आणि सर्वांनाच समानता न्याय दिला आहे, असेही पालकमंत्री जारकीहोळी म्हणाले.Satish

 belgaum

जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी संविधानाची पूर्वपिठिका सांगितली. प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी हात उंचावून भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करण्याद्वारे वचनबद्धता व्यक्त केली. यावेळी महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, आमदार असिफ सेठ, पोलीस आयुक्त एस. एम. सिद्रामप्पा, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, जिल्हा पोलीस प्रमुख डाॅ. भीमाशंकर गुळेद, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होणकेरी, महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, उपविभागाधिकारी श्रवण नायक, नगर विकास योजनाधिकारी मल्लिकार्जुन कलादगी, समाज कल्याण खात्याचे सहाय्यक संचालक लक्ष्मण बबली, दिव्यांग कल्याण अधिकारी नामदेव बैलकर, पशु संगोपन खात्याचे उपसंचालक राजीव कोलेर, जिल्हा परिशिष्ट कल्याण अधिकारी बसवराज कोरीहुली, डीएचओ डाॅ. महेश कोणे, क्रीडा व योजन खात्याचे उपनिर्देशक बी. श्रीनिवास, बागायत खात्याचे उपनिर्देशक महांतेश मुरगोड तसेच सामाजिक कार्यकर्ते मल्लेश चौगुले, महादेव तळवार, भावकन्ना भंग्यागोळ (नायक) आदीसह दलित संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

जिल्हा प्रशासनाकडून अधिवेशनाची तयारी -पालकमंत्री

राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाची तयारी नगरपालिका खाते आणि जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.

शहरामध्ये आज रविवारी ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. गॅरंटी योजनांमुळे सरकारला त्रास सहन करावा लागत आहे. त्यासाठी कृषी, रेशीम आणि बागायत खाते एकमेकांमध्ये विलीन करण्याचा विचार सुरू असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात बोलताना गेल्या 10 वर्षांपूर्वीपासून सरकारची कांही खाती एकमेकात विलीन करण्याची चर्चा होत आहे. कृषी आणि बागायत खाते एकमेकात विलीन करावे ही चर्चा तर फार पूर्वीपासूनच होत आहे. त्या संदर्भात विचारही केला जात आहे. मात्र याच्याशी गॅरंटी योजनांचा कांही संबंध नाही, असे त्यांनी पुढे सांगितले. जातींसंदर्भातील कांतराज अहवाल स्वीकारणे सरकारला त्रासदायक ठरू शकते? आता या प्रश्नाला उत्तर देताना तो अहवाल सरकारसाठी त्रासदायक ठरतोय की नाही ही पुढची गोष्ट झाली. सर्वप्रथम कांतराज यांनी आपला अहवाल सरकारला द्यायला तर हवा. तो हाती आल्यानंतर चर्चा करून सरकार त्यावर निर्णय घेईल, असे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.