Sunday, May 5, 2024

/

‘खवण्याचा दवणा’…

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष (चिरमुरे तुरमुरे)…….शिष्य: गुरुजी बरेच दिवस तुमचं दर्शन नाही. तुमच्या अमोघ वाणीतून स्त्रवणारी आमच्या गावची कहाणी नाही. लोकं तुमच्या दिव्य वाणीतून येणारी ज्ञानगंगा ऐकायला उत्सुक आहेत.

गुरुजी: वत्सा…. काही वेळा आत्मपरीक्षण ,आत्मसंशोधन, चिंतनमनन केल्याशिवाय ज्ञान वाटण्याचे काम करता येत नाही. आता मी अनेक गोष्टीचा आढावा घेतला आहे. घडलेल्या नव्या नव्या घटनांचा परामर्श घेतला आहे. आता त्याबद्दल काही बोलावसं वाटतं म्हणून तुझ्याकडे आलो.

शिष्य: गुरुजी तुमच्या दिव्य वाणीची प्रचिती घेण्यास आम्ही उत्सुक आहोत

 belgaum

गुरूजी: शिष्या ..आता नवीन वृत्तवाहिनी चालू झाली आहे त्यासाठी एका भूकपत्राचा प्रमुख प्रतिनिधी बाहेर पडून त्या वृत्तवाहिनीचे संचालक पद स्वीकारलेले आहे.

शिष्य : गुरुजी तुम्हाला कसं हे कळालं? आणि त्यांनी आपल्या महत्त्वाच्या माणसाला सोडलेच कसे?

गुरूजी :अरे वत्सा… गाढवाला गुळाची चव काय ? माणसातील कसब ओळखण्याचं ज्ञान तिथून गायब झालं अनेक चांगली माणसं तिथून निघून गेली अरे तिथल्या एका हसऱ्या रेषा काढणाऱ्या कसबी कलाकारावरही अशीच आपत आली आहे. आणि गावभर तू डोळे झाकून हिंडतोस का? गल्लीबोळातील हसऱ्या छबीतले सल्लागार संपादकाचे फोटो बघितले नाहीस का? आणि त्या हसण्या पाठीमागील तुला कारण समजत नाही का?

शिष्य: गुरुजी फोटो बघेनच मी? पण हसण्या पाठीमागचं कारण काय?

गुरूजी : भूक पत्राची ढासळलेली प्रतिमा आणि हरवलेला दर्जा यामुळे त्या भूक पत्राचा आता बोन्साय झाला आहे. आणि त्यांची रणनीती स्वतः त सुधारणा करण्यापेक्षा दिवस रात्र दुसऱ्याला पाण्यात पाहण्यातच जात आहे. दर्जा हरवलेलं पत्र म्हणजे भूक पत्र. याचा झालेल्या साक्षात्काराने सल्लागार संपादक मिश्किलपणाने हसत आहेत.

शिष्य: मग.. बेळगावची पत्रातून हलणारी सूत्रे आता त्यांच्या हातातून निसटली म्हणायची का?

गुरूजी : ती सूत्रे त्यांच्याकडे नव्हतीच कधी. त्यांचं काम खुडुक कोंबडी सारखे होते. अंडी घालायची दुसऱ्या कोंबडीने आणि रावणी बसणार यांनी…

शिष्य: गुरुजी जरा विस्ताराने सांगा..Chirmuri turmuri

गुरूजी : अरे लोक श्रम करून उमेदवार निवडतात. प्रचार करून निवडून आणतात मग कोटातला जहागीरदार येऊन हे.. माझंच काम म्हणून छाती बडवून घेणार. ही यांची पद्धत त्यामुळे यांच्या या कृतीला गावातली जनता कंटाळली आहे आणि खंडीच्या वरणात मिठाची पिशवी ओतणारा हा संघटनेचे सत्यानाश करणार.

शिष्य : गुरुजी भूक पत्राच्या माध्यमातून आता पर्यंत त्यांनी संघटनेची बाजू उचलून धरली नाही का?

गुरूजी : तो बुरखा होता आता सध्याच्या निवडणुकीत सगळ्याच पक्षाचं छापून दिलं की म्हणजे निष्ठेचा बागुलबुवा उभा करायचा आणि आपली तूमडी भरून घ्यायची. गावातील अनेक सामाजिक संस्था हडपण्याचा कुटील डाव यांचा निरंतर चालूच असतो.

शिष्य: गुरुजी खर आहे हे म्हणून गावातील जनता कोट वाल्याला निरंतर शिव्या देत राहते.

गुरूजी: वत्सा… आता दुनियेचं चित्र पालटलं ,नवीन माध्यम आली .आता नवीन आलेल प्रसार माध्यम या परिसरात आपलं नाव गाजवील यात शंका नाही आणि भूकपत्राला चांगलाच ‘प्रसाद’ मिळेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.