Friday, April 19, 2024

/

बारावी मूल्यमापन प्रक्रियेला १ एप्रिलपासून प्रारंभ

 belgaum

बेळगाव लाईव्ह : १२ वी परिक्षार्थीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम १ एप्रिल पासून सुरु करण्याचा निर्णय मंडळाने घेतला असून प्रत्येक परीक्षा केंद्रावर निरीक्षक, केंद्र प्रमुख, यासह पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बारावी परीक्षा संपताच उत्तरपत्रिका मूल्यमापनास प्रारंभ करण्यात येत आहे. नव्या शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने माध्यमिक शिक्षण खाते व पदवीपूर्व शिक्षण खात्यांचे विलीनीकरण करून कर्नाटक राज्य परीक्षा व मूल्यमापन मंडळाची रचना केली आहे. त्यांच्या नियोजनानुसार तत्काळ मूल्यमापन केले जाणार आहे.

उत्तरपत्रिका तपासणीसाठी ६५ ठिकाणी तयारी करण्यात आली आहे. यासाठी राज्यातील विविध विषयांच्या ३ वर्षाहून अधिक अनुभव असलेल्या सरकारी अनुदानित व खासगी विना अनुदानित प्राध्यापकांसह विविध अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. बेळगाव जिल्ह्यात पाच केंद्रांवर पेपर तपासणी होणार आहे. चालूवर्षी १० व १२ वीच्या परिक्षा नव्या खात्याद्वारे घेण्यात येत आहेत.

बारावीच्या परिक्षा २९ रोजी संपत असून १० वीच्या परीक्षा ३१ पासून सुरु होत आहेत. परिणामी परीक्षा संपताच प्राध्यापकांना उत्तरपत्रिका तपासणीसाठी नियोजित ठिकाणी जावे लागणार आहे. परीक्षेच्या कार्यातून लवकरात लवकर शिक्षक व प्राध्यापकांना मुक्त करून विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्यांनाही पाचारण करण्यात येणार आहे.

 belgaum

बारावी पेपर तपासणी ३० मार्चपासून सुरू केली जाणार होती. पण, प्राध्यापक संघटनेच्या विरोधामुळे १ एप्रिलपासून तपासणी होणार आहे. नव्या स्वरुपातील प्रश्न पत्रिकांमुळे चांगल्या निकालाची अपेक्षा असून प्राध्यापकांना लवकर निकाल काढता येणार असून विषयनिहाय बहुपर्यायी प्रश्नांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे विद्यार्थ्यांनाही त्याचा अनकूल परिणाम होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.