बेळगाव लाईव्ह : हलगा-मच्छे बायपासप्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर दोन्ही बाजुचे युक्तीवाद पूर्ण झाले असून बायपासप्रकरणी निकाल सलग तिसऱ्यांदा लांबणीवर पडला आहे. आता ३१ मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहे.
बायपासप्रकरणी गेल्या महिन्यात जिल्हा सत्र न्यायालयात महामार्ग प्राधिकरणाच्या वकिलांनी युक्तीवाद केला होता.
त्यावर आक्षेप घेत शेतकऱ्यांचे वकील ऍड. रविकुमार गोकाककर यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजुचे युक्तीवाद पूर्ण झाले असून जिल्हा सत्र न्यायालय निकाल जाहीर करणार होते.
याप्रकरणी गेल्यावेळी न्यायालयाने निकाल लांबणीवर टाकला. २१ मार्च रोजी पुढील सुनावणी होणार होती. मात्र पुन्हा निकाल लांबणीवर पडला आहे.