Friday, March 29, 2024

/

महापौर निवडीत भाजपची इकडे आड तिकडे विहीर..

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष :दीर्घकाळ लांबलेली बेळगाव महापालिकेची निवडणूक अवघ्या काही तासावर आली असताना भाजप कोअर कमिटी समोर एक नवा पेच प्रसंग उभा राहिला आहे.कन्नड संघटनांनी भाजप मधील कन्नड भाषिक महिलेला महापौर पद मिळावे अशी मागणी केली आहे कन्नड संघटनांच्या मागणी नुसार महानगर भाजप अध्यक्ष आणि बुडा अध्यक्ष ही दोन मोठी पदे मराठा समाजाच्या प्रतिनिधी कडे आहेत त्यामुळे पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत इतिहासात पहिल्यांदा भाजपने 35जागा जिंकत बहुमत मिळवले आहे त्यावेळी भाजप मधील कन्नड भाषिकाला महापौर पद द्यावे अशी कानडी संघटनांनी भूमिका मांडली आहे.

या कन्नड संघटनांच्या मागणीला प्रत्युत्तर देताना भाजप प्रभारी निर्मलकुमार सुराना यांनी महापौर उपमहापौर कन्नड मराठी नसून भाजपचा असेल असे स्पष्ट केले आहे.बेळगाव दक्षिण मतदार संघातील भाजप मधील दोन कन्नड भाषिक आणि दोन मराठी भाषिक महिला महापौर पदासाठी इच्छुक आहेत या पाश्र्वभूमीवर मराठी संघटना मात्र आमचाच महापौर हवा अश्या सुप्त भूमिकेत आहे. जर मराठी भाषिक महापौर भाजप कडून दिला नाही तर त्याची किंमत आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला मत पेटीत मोजावी लागणार आहे.

अगोदरच बेळगाव जिल्ह्यातील अंतर्गत लाथाळ्यानी भाजप घायाळ झाला आहे त्यातच उत्तर दक्षिण ग्रामीण आणि खानापूर या मतदार संघात भाजपची पकड ढीली झाली आहे दिवसेंदिवस महाराष्ट्र एकीकरण समिती मजबूत होत चालली आहे अश्या वेळी भाजपसाठी मराठी भाषिकांला महापौर पदावरून डावलने किती फायदेशीर ठरू शकते याबाबत विचार करावा लागणार आहे.

 belgaum

वास्तविक पाहता भाजपने भाषिक आस्मितेचा मुद्दा न घेता निवडणुकीत 35जागा मिळवत मोठा विजय मिळवला होता असे असताना कानडी संघटनांनी देखील कन्नड भाषिक महापौर व्हावा असा आग्रह करणे कितपत योग्य आहे?किंवा मराठी भाषिक महापौर व्हावा यासाठी मराठी संघटना आक्रमक व्हाव्यात का? असा प्रश्न देखील सोशल मीडियावर उपस्थित होत आहे. मात्र आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता दोन्ही आमदारां साठी महापौर पदाच्या रेस मधून मराठा समाजाला दूर ठेवणे नुकसान दायक ठरू शकते असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

या शिवाय सत्तेत असताना दुसरीकडे ग्रामीण भागातील काँग्रेस नेत्यांनी विशेषता सतीश जारकिहोळी यांनी ए पी एम सी अध्यक्ष पदी युवराज कदम,आनंद पाटील,जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पदी अरुण कटाबळे,यासह रमेश गोरल मोहन मोरे सारखं सारख्यांना जिल्हा स्तरीय मोठी पदे देऊ केली होती भाजपने मराठा समाजाला डावलल्यास वेगळा संदेश पोहोचू शकतो यासाठी आगामी महापौर निवड भाजपसाठी ‘एकीकडे आड तर दुसरीकडे विहीर’ अशीच स्थिती आहे असेही जाणकारांचे मत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.