Tuesday, April 30, 2024

/

एकीसाठी मध्यवर्तीचे शिष्टमंडळ बुधवारी खानापुरात

 belgaum

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या खानापुरातील एकी संदर्भात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने एक पाऊल पुढे टाकत मध्यवर्ती चे शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्यवर्ती समितीचे नेते राजाभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखालील मध्यवर्ती समिती चे सदस्य बुधवारी खानापूर येथील शिवस्मारकात बैठक घेणार आहेत. खानापूर तालुक्यातील विविध खेड्यातील मराठी भाषिक महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्ते नेते यांच्या सोबत बैठक करणार आहेत.

बुधवार 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 11वाजता ही बैठक होणार असून खानापूरातील दोन्ही गटाच्या
पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची हजर राहावेअसे आवाहन मध्यवर्ती समितीने केले आहे.मागील काही दिवसापूर्वी खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्ते आणि नेते यांच्यात एकी करून समिती बळकट करण्यासाठी खानापूर तालुक्यातील विविध खेड्यातील कार्यकर्ते व नेते मंडळी यांनी मध्यवर्ती म ए समितीच्या पदाधिकारी भेट घेऊन चर्चा केली होती खानापूर येथे बैठकीचे आयोजन करून मार्ग काढण्यासाठी सहाय्य करावे अशी विनंतीही केली होती.Khanapur unity

 belgaum

यासंदर्भात मध्यवर्ती म. ए.समितीच्या सुकाणू समिती सभासदांची बैठक सोमवारी दीपक दळवी यांच्याअध्यक्षतेखाली झाली त्या बैठकीत राजाभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बुधवार दिनांक 9नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11:00वाजता खानापूर येथील शिवस्मारकात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. खानापूर व इतर खेड्यातील समितीच्या कार्यकर्त्यांनी वेळेवर हजर राहून आपली मते मांडावीत असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

 belgaum
Previous article
मधमाश्यांच्या हल्ल्यात वृद्ध महिला जखमी *मधमाशांच्या हल्ल्यात वृद्ध शेतकरी महिला जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे. सुगी निमित्त येळ्ळूर शिवारात भातकापणीचा जोर असल्याने सोमवारी आपल्याच शेतात भातकापणीला आलेल्या चांगूणा कृष्णा कुगजी वय 70 यांना मोठ्या प्रमाणात मधमाशांनी दंश केल्याने त्या जखमी झाल्या आहेत. चांगुणा यांच्या सह या घटनेत इतर दोन महिलानांही मध माश्यांच्या झुंडीने चावा घेतला मात्र त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत. शेतकरी नेते राजू मरवे आपल्या शेतात काम करायला गेले होते त्यावेळी बाजूच्या शेतातील घटना पाहून अग्नी पेटवून धूर करुन मधमाशांना हुसकावून लावले व जखमी महिलेच्या तोंडावरील व अंगावरील सर्व काटे काढूण टाकले. माश्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेच्या घरच्याशी संपर्क साधून येळ्ळूर रोड के एल ई इस्पितळात उपचारास घेऊन जाण्याचे मार्गदर्शन केले. मर्वे यांनी सांगितलेल्या माहितीनुसार चांगणा यांचे माश्यांच्या दंशाने तोंड,ओठ मोठ्या प्रमाणात सुजले असल्याने त्यांना चालता येत नव्हते त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सावकाश त्यांना येळ्ळूर रोडपर्यंत नेऊन नंतर के एल ई इस्पितळात उपचारासाठी दाखल केले. शेतकऱ्यांनी शेतात काम करताना मध माश्यांच्या टोळीने हल्ला केल्यास शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे बनले आहे.
Next article

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.