Saturday, April 20, 2024

/

गटारींची स्वच्छता नसल्याने सांडपाणी रस्त्यावर

 belgaum

पावसाचा जोर गेल्या तीन चार दिवसात वाढला आहे. थोड्या विश्रांतीनंतर दमदार पडणाऱ्या पावसामुळे शहरातील समस्यांनी डोके वर काढले आहे.

अनेक भागातील सखल भागात पावसाचे पाणी साचून रस्ते जलमय होत आहेत. साचलेल्या पावसाच्या पाण्याला वाट नसल्याने अनेक भागात गटारी तुंबल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

बेळगाव शहरातील महाद्वार रोड, तानाजी गल्ली या परिसरात गटारी तुंबण्याची समस्या नेहमीच उद्भवत असते. सकाळपासून विश्रांती घेऊन दुपारनंतर दमदार आगमन करणाऱ्या पावसामुळे या भागात पुन्हा पाणी साचले आहे.Drainage water

गटारींमधून पुढे जाणाऱ्या पावसाच्या पाण्याला वाट नसल्याने ड्रेनेज आणि गटारीचे सांडपाणी रस्त्यावर वाहात आहे. गटारीत कचरा तुंबल्याने हे पाणी गटारीतच साचत असल्याचे दिसून येत आहे.

या परिसरात हि समस्या नेहमीच उद्भवत असून यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. गटारीच्या या समस्येत केवळ मनपा प्रशासनाचीच जबाबदारी नसून नागरिकांनीही कचऱ्याची योग्यपद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. महाद्वार रोड, तानाजी गल्ली कॉर्नरच्या या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी येथील रहिवासी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.