Friday, April 26, 2024

/

या’ भागात तीव्र पाणीटंचाई : आमदारांनी लक्ष देण्याची मागणी

 belgaum

बेळगाव शहर पाणीपुरवठ्याची जबाबदारी असणाऱ्या एल अँड टी कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे जयनगर -हिंडलगा परिसरात गेल्या आठ दिवसापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याअभावी हाल होत असल्यामुळे नागरिकात संताप व्यक्त होत आहे.

जयनगर हिंडलगा परिसरात गेल्या आठ दिवसापासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद झाला आहे. यासंदर्भात वारंवार तक्रार करून देखील एल अँड टी कंपनीकडून आम्ही टँकरची व्यवस्था करतो तुमचे तुम्ही प्रत्येकी दोन -दोन घागरी याप्रमाणे पाण्याचे वाटप करून घ्या, असे आश्वासन दिले जाते. मात्र प्रत्यक्षात कार्यवाही होत नाही. कंपनीच्या तक्रार नोंदवून घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्याकडून जयनगर येथील नागरिकांना बेजबाबदार उद्धट उत्तरे दिली जात आहेत.

नागरिकांनी या भागाच्या हॉल्वमनशी संपर्क साधला असता आपण पुण्यात असून येऊ शकत नसल्याचे उत्तर त्याच्याकडून मिळाले आहे. लोकप्रतिनिधी मधून सामाजिक समस्या सोडविण्यासाठी निवडून दिलेल्या या भागाच्या नगरसेविका देखील कांहीच कामाचा नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

 belgaum

हिंडलगा, हनुमाननगर या परिसराला 24 तास पाणीपुरवठा केला जाईल असे जाहीर करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात गेल्या आठ दिवसापासून पिण्याच्या पाण्याचा पत्ता नसल्यामुळे नागरिकांना पैशाचा भुर्दंड सहन करून बाजारातून पाणी विकत आणून गरज भागवावी लागत आहे. या पाणीटंचाईमुळे विशेष करून गृहिणीवर्गाची मोठी गैरसोय होत आहे.

या भागात कूपनलिका देखील नसल्यामुळे गरीब सर्वसामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. तरी एल अँड टी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि जयनगर -हिंडलगा भागाचा पाणीपुरवठा युद्ध पातळीवर सुरळीत करावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.