Thursday, May 2, 2024

/

‘अमृत’ योजनेअंतर्गत 65 गावांची निवड

 belgaum

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त अमृत ग्रामपंचायत योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 65 ग्रामपंचायतीची निवड झाली असून त्यांच्या कार्यक्षेत्रात रस्ते, सौरदिवे, शुद्ध पाणीपुरवठा, डिजिटल ग्रंथालय, उद्याने सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प आदींचा विकास केला जाणार आहे, अशी माहिती बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांनी दिली.

बेळगाव जिल्ह्यात 500 ग्रामपंचायती आणि 14 तालुक्यांचा समावेश आहे. या सर्व तालुक्यांमधील 65 ग्रामपंचायतीची अमृत ग्रामपंचायत योजनेसाठी निवड झाली आहे. निवड झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये भू-जल आणि पर्यावरण संरक्षणावर भर दिला जाणार आहे.

यासाठी वृक्षारोपण, तलाव खोदाई आणि इतर योजना राबविल्या जाणार आहेत. राज्यात ग्रामपंचायतींचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. गावात स्वच्छता राखण्यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत घरगुती आणि सार्वजनिक शौचालयांची निर्मिती केली जाणार आहे.

 belgaum

याबरोबरच निवड झालेल्या ग्रामपंचायतींमधील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी विशेष प्रकल्प उभारण्यात येणार आहे. ग्रामीण महिलांना सक्षम करण्यासाठी रोजगार हमी योजना राबविली जात आहे. या अंतर्गत गावागावांमध्ये तलाव खुदाई प्रकल्प राबविले जाणार आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रत्येक नोंदणीकृत कुटुंबाला वर्षभरात 100 दिवस काम देणे बंधनकारक आहे.

या माध्यमातून ग्रामीण भागातील कष्टकरी महिलांना कामं दिली जाणार आहेत. याबरोबरच कृषी फलोत्पादन आणि सामाजिक वनीकरण विभागातर्फे वृक्षारोपण व शेतकऱ्यांसाठी इतर फायदेशीर योजना राबविल्या जाणार आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.