Friday, April 26, 2024

/

‘पण’ छोटा…. मात्र उद्देश मोठा!

 belgaum

छ. शिवरायांवरील नितांत श्रद्धेपोटी त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या त्यांच्या मावळ्यांचे वंशज आज देखील अस्तित्वात आहेत याची प्रचिती बेळगावच्या मोहन पाटील या युवकाने आणून दिली आहे. अटक झालेले श्रीराम सेना हिंदुस्तानचे जिल्हाध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्यावर प्रगाढ श्रद्धा असणाऱ्या मोहनने त्यांची जामिनावर सुटका होत नाही तोपर्यंत चप्पल न घालता अनवाणी राहण्याचा ‘पण’ केला आहे.

सदाशिवनगर बेंगलोर येथे गेल्या 17 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती विटंबनेचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर त्या रात्री बेळगावात शिवप्रेमींनी आंदोलन छेडले. त्यावेळी शहरात दंगडफेक आणि तोडफोडीच्या घटना देखील घडल्या.

या पार्श्वभूमीवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवून श्रीराम सेना हिंदुस्तानचे जिल्हाध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्यासह इतर अनेक युवानेते व मराठी कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. मराठी द्वेषापोटी सूड भावनेतून या सर्वांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा सार्वत्रिक आरोप आहे. दरम्यान छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याच्या घटनेविरुद्ध आवाज उठविणाऱ्या रमाकांत कोंडुसकर यांना अटक झाल्यामुळे शिवप्रेमीमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.Mohan patil

 belgaum

विशेष करून शहरातील श्रीराम सेनेचा कार्यकर्ता मोहन पाटील याच्या भावना अतिशय दुखावल्या गेल्या आहेत. मोहन याची रमाकांत कोंडुसकर यांच्यावर नितांत श्रद्धा असून त्यांच्या प्रखर हिंदुत्ववादाचा तो पुरस्कर्ता आहे. त्यामुळे पोलिसांनी अटक केलेल्या कोंडुसकर यांची जोपर्यंत जामिनावर मुक्तता होत नाही तोपर्यंत पायात चप्पल न घालण्याचा ‘पण’ मोहन पाटील याने केला आहे.

मोहनचा हा ‘पण’ तसा छोटा असला तरी त्यामागील उद्देश किती मोठा आहे हे सांगण्याची गरज नाही. सध्या अनवाणी पायाने त्याची दिनचर्या सुरु आहे. मोहनचा पायात चप्पल न घालण्याचा हा निर्धार सर्वत्र कुतूहलाचा विषय झाला असून आपल्या नेत्यावरील त्याच्या नितांत श्रद्धेचे कौतुक केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.