Tuesday, May 7, 2024

/

घाबरू नका, तुम्हाला फसवणार नाही ! भालचंद्र यांचे कवटगीमठ यांना आश्वासन

 belgaum

घाबरू नका, तुम्हाला फसवणार नाही असे सांगत अरभावीचे आमदार व केएमएफचे अध्यक्ष भालचंद्र  जारकीहोळी यांनी विधानपरिषद निवडणुकीतील भाजपचे उमेदवार
महांतेश कवटगीमठ यांना अभय दिले.

अरभावीत कवटगीमठ यांच्या प्रचारसभेत बोलताना भालचंद्र म्हणाले, रमेश जारकीहोळी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर मला मंत्रिपद मिळावे यासाठी १५ आमदारांनी मोहीम चालवली. त्यात दुर्योधन ऐहोळे, महादेवप्पा यादवाड आणि कवटगीमठ सुद्धा होते. त्यामुळे गुरु तुम्ही घाबरू नका, आम्ही तुम्हाला फसवणार नाही.

काँग्रेसचा पराभव व्हावा आणि भाजप जिंकावा हेच आमचे उद्दिष्ट आहे. गेल्यावेळीही ते जिंकतील असे मी सांगितले होते आणि झालेही तसेच.आणि यावेळीही तसेच होणार आहे.असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 belgaum

कवटगीमठ याना देवाचा आशीर्वाद आहे. अरभावी मतदार संघात विधान परिषदेचे ६०८ मतदार आहेत. त्यातील केवळ चौघे आमच्या विरोधात आहेत. पण ६०४ आमच्यासोबत आहेत. त्यामुळे तुम्ही मुळीच घाबरू नका .असे भालचंद्र यांनी कवटगीमठ याना उद्देशून सांगितले.

एकंदर बंधू लखन आणि कवटगीमठ याना विधान परिषदेत पाठवण्यासाठी रमेश आणि भालचंद्र या जारकीहोळी बंधूंनी चांगलीच कंबर कसली आहे. मतदार त्यांना कितपत साथ देतात हे पाहणे कुतूहलाचे ठरेल.दरम्यान यात भाजपच्या जय पराजय यावर या बंधुंचेही पुढील भवितव्य ठरणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.