Friday, April 19, 2024

/

नवा समाज निर्मितीसाठी माझे प्रयत्न : आम. जारकीहोळी

 belgaum

धर्माच्या विरोधात बोललो म्हणून माझ्यावर भरपूर टीका झाली असली तरी मी माझा मार्ग सोडलेला नाही. नवनव्या लोकांना सोबत घेऊन नवा समाज निर्माण करण्यासाठी माझे प्रयत्न सुरूच आहेत, असे केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

चिक्कोडी येथे सोमवारी सायंकाळी मानव बंधुत्व वेदिके आणि भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने आयोजित ‘आमचे पाऊल बुद्धाकडे’ या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर खास उपस्थित होते. निजगुणानंद स्वामीजी आणि मी गेली अनेक वर्षे राज्यात अंधश्रद्धेच्या विरोधात लढा देत आहोत. आता आम्हाला राजरत्न आंबेडकर यांची साथ लाभल्यामुळे आनंद झाला आहे. भगवान बुद्ध, बसव, डाॅ. आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा फुले यांनी घालून दिलेल्या मार्गावर वाटचाल करून आम्ही समाजात परिवर्तन आणले पाहिजे, असेही आमदार सतीश जारकीहोळी म्हणाले.

राजरत्न आंबेडकर यांनी आपण बदलले पाहिजे भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेल्या मार्गावर चालले पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमास निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील, चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, महावीर चिंगळे, रवी नायकर, जीवन मांजरेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.