Friday, April 19, 2024

/

बायपासला शेवटपर्यंत विरोध : येळ्ळूर रोड शिवारात आंदोलन

 belgaum

हालगा -मच्छे बायपास रस्त्याचा खटला न्यायालयात आहे. तथापि रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डर आणि न्यायालयाने स्थगिती आदेश रद्द केल्याचा पुरावा सादर न करता बेकायदेशीररीत्या पोलिसांच्या मदतीने दडपशाही करत या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मात्र आम्ही शेवटपर्यंत या रस्त्याला विरोध करणार असल्याचा निर्धार शेतकर्‍यांनी व्यक्त केला आहे. यासाठी आज येळ्ळूर रोड येथील शिवारात शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन छेडले आहे.

शेतकरी नेते राजू मरवे यांच्यासह अन्य शेतकरी नेत्यांच्या नेतृत्वाखाली येळ्ळूर रोड येथील शिवारात जवळपास 50 हून अधिक शेतकऱ्यांनी आपल्या बायका-मुलांसह आज शनिवारी सकाळपासून धरणे आंदोलन छेडले आहे. यामध्ये भोमेश बिर्जे, तानाजी हलगेकर, महेश चतुर, भैरू कंग्राळकर, मनोहर कंग्राळकर, मोनाप्पा बाळेकुंद्री, हणमंत बाळेकुंद्री, गुंडू भामाण्णाचे, नितीन पैलवानाचे, विनायक हलगेकर, नागेश काजोळकर, आनंदराव काजोळकर, किरण सांबरेकर, विलास घाडी, मारुती बिर्जे, सोमनाथ चतुर, नीलम बिर्जे, सविता बिर्जे, रेणुका बिर्जे, अक्षता हलगेकर, मोनाक्का बिर्जे, इंदू तारीहाळकर आदींचा समावेश आहे. बायपास रस्त्याला शेतकऱ्यांचा इतका तीव्र विरोध आहे की सर्व शेतकरी आपल्या लहान मुलाबाळांसह आंदोलनाला बसले आहेत.

यावेळी बेळगाव लाईव्हशी बोलताना शेतकरी नेते राजू मरवे यांनी हालगा -मच्छे बायपास रस्त्यांमुळे सुपीक शेतजमीन उध्वस्त होऊन शेतकरी रस्त्यावर येणार आहेत. या बायपास रस्त्याची वर्क ऑर्डर आम्हाला दाखविली जात नाही. त्याचप्रमाणे न्यायालयाने या रस्त्याचा स्थगिती आदेश रद्द केल्याचे सांगितले जात आहे. Farmer prot

मात्र न्यायालयाचा तसा लेखी आदेश दाखवण्यास अधिकारीवर्ग तयार नाही. एकंदर खोटे बोलून कायदा पायदळी तुडवून बायपासचे काम सुरू करण्यात आले आहे असे सांगून राज्य सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा. तसेच सरकारने प्रत्यक्ष जागेवर येऊन शेतकऱ्यांच्या भावना जाणून घ्याव्यात आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी मरवे यांनी केली.

दरम्यान, आज शनिवारी तिसऱ्या दिवशी पोलीस संरक्षणात बायपास रस्त्याचे काम सुरूच ठेवण्यात आले आहे. यावेळी शेतकरी रस्त्याच्या बाजूला बसून निदर्शने करत आहेत. बेकायदेशीरपणे हा रस्ता केला जात आहे. मात्र आम्ही संबंधितांवर गुन्हा दाखल करणार असून न्यायालयाचा अवमान देखील केला जात असल्याने हे काम कोणत्याही परिस्थितीत थांबवण्यासाठी आपला लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकर्‍यांनी व्यक्त केला. काल शुक्रवारी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी भेट दिली. यावेळी पिकांमध्ये आम्ही जेसीबी घालणार नाही असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले. मात्र या रस्त्याच्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी भात पेरणी केली आहे. ते भात जोमात आले आहे. तेंव्हा त्या ठिकाणी काय करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.