Monday, May 12, 2025

/

खानापूरमध्ये शेतकऱ्याचा मृत्यू

 belgaum

शेतात चारा आणण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा विजेच्या स्पर्शाने मृत्यू झाला. खानापूर तालुक्यात ही घटना घडली असून हळहळ व्यक्त होत आहे.

एका शेतकऱ्याला विजेचा स्पर्श झाला असून तो मरण पावला. खानापूर तालुक्‍यातील कग्गनागी गावातील महावीर शिवप्पा मल्लानवार या ५0 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने वीजवाहिन्या तुटून पडल्या आहेत. शेतकरी महावीर शिवाप्पा मल्लनवर यांचा चारा घेऊन जाताना विजेच्या तारेचा स्पर्श होऊन ही घटना घडली.

या प्रकरणी नंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी शेतात वेगवेगळ्या कामासाठी जाताना खबरदारी घेण्याची गरज आहे .

तुटलेल्या तारांचा स्पर्श होऊ नये या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेऊन शेतात वावरण्याची गरज निर्माण झाली असून या प्रकरणी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

हेस्कोम अधिकाऱ्यांनी तुटलेल्या तारा वेळीच जोडणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी तारा तुटलेल्या आहेत त्या त्या भागातील विद्युत प्रभार बंद करून शेतकरी आणि वन्य प्राण्यांचा जीव वाचण्याची गरज निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.