Thursday, March 28, 2024

/

5 रुग्ण आढळल्यास संपूर्ण गाव होणार सीलडाऊन!

 belgaum

ग्रामीण भागातील कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणाखाली आणण्याची जबाबदारी राज्य शासनाने जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांवर सोपविल्यामुळे त्यांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली असून आता एकाच गावात 5 रुग्ण आढळल्यास संपूर्ण गाव सीलडाऊन केले जाणार आहे.

कोरोनाची दुसरी लाट शहराप्रमाणे ग्रामीण भागात देखील तीव्र झाली असून त्या ठिकाणच्या रूग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. परिणामी राज्य शासनाने ग्रामीण भागावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. सध्या राज्यात शहरी भागात दररोज सरासरी 1587 आणि ग्रामीण भागात सरासरी 4598 कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत.

ही बाब चिंताजनक असल्यामुळे शासनाने ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणाचे नियम आणखी कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे.

 belgaum

ग्रामीण भागात कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्यास त्याला होम आयसोलेशन मध्ये न ठेवता कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल केले जावे असा आदेश यापूर्वी शासनाने बजावला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात होम आयसोलेशन पद्धत बंद करण्यात आली आहे.

Peeranwadi
Peeranwadi seal

आता एकीकडे शासन लाॅक डाऊनचे नियम शिथिल करीत असतानाच ग्रामीण भागाततील कोरोना नियंत्रणाचे नियम कठोर केले जात आहेत. ग्रामीण भागातील संसर्ग नियंत्रणाखाली आणण्यासाठी जबाबदारी आता जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. ग्रामीण भागात कोरोना प्रादुर्भाव वाढल्यास त्याला तेच जबाबदार असणार आहेत.

एखाद्या गावात 5 रुग्ण आढळून आल्यास त्या गावाला सीलडाऊन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय देखील शासनाने घेतला आहे. शहरी भागात एकाच परिसरात 25 रुग्ण आढळल्यास तो भाग मिनी कंटेन्मेट झोन केला जातो. आता ग्रामीण भागातही एखाद्या गावात 5 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यास संपूर्ण गाव सीलडाऊन केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.