Monday, April 29, 2024

/

राजकारण्यांसाठी नैतिकता महत्वाची : प्रल्हाद जोशी

 belgaum

भारतीय जनता ही नेहमीच इतरांना आदर्शवत ठेऊन जगते. मग ते राजकारणी असोत किंवा सुपरस्टार! आपल्याकडे जनता पाहते.

आपला आदर राखते यासाठी राजकारण्यांनी आणि सामाजिक स्तरावरील सर्व मान्यवरांनी आपली पत आणि नैतिकता राखणे महत्वाचे असल्याचे मत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केले. आज बेळगाव दौऱ्यावर आलेल्या प्रल्हाद  जोशींनी प्रसारमाध्यमांसमोर हे मत व्यक्त केले आहे.

बेळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या रमेश जारकीहोळी सीडी प्रकरणाविषयी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले कि, जनता राजकारण्यांना विशेष आदर देते. जनता आपले अनुकरण करते. यामुळे जनमानसात शोभेल आणि आदर्शवत वाटेल, असेच प्रत्येक लोकप्रतिनिधीने वागणे गरजेचे आहे. या प्रकरणाबद्दल मी अधिक काही बोलणार नाही, असे सांगून त्यांनी विषय टाळला. यासोबतच आरोग्य मंत्री के. सुधाकर यांच्या ‘एकपत्नित्व’ या वक्तव्याचेही त्यांनी खंडन केले.सध्या बेळगावमध्ये लोकसभा पोटनिवडणूक होऊ घातली आहे. या सर्व प्रकरणांचा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

 belgaum

पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिवंगत रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांनी केलेल्या विकासाची दखल जनता घेईल आणि याची दखल घेऊन भाजप उमेदवाराला नक्की यश मिळवून देतील, असा विश्वास देखील केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलून दाखविला.

पोटनिवडणुकीच्या तोंडावर सुरु झाली टीकास्त्रांची मालिका! प्रल्हाद जोशींनी बेळगावमध्ये केले काँग्रेसला लक्ष्य!

निवडणूक आल्या कि एकमेकांविरोधात नेहमीच राजकारणी टीकास्त्र सोडत असतात. काहीवेळा या टीका टोकाला पोहोचतात तर कधी कधी या टीका हस्यात्मक आणि मनोरंजन करणाऱ्या ठरतात. बेळगावमध्ये होऊ घातलेल्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांच्या बेळगाव वाऱ्या सुरु झाल्या आहेत. बेळगावमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दाखल झालेले केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशींनी आज काँग्रेस वर निशाणा साधला. काँग्रेस पक्ष हा एखाद्या बसस्टँड प्रमाणे असल्याची टिप्पणी त्यांनी केली.

काँग्रेसमध्ये म्हणजे एखाद्या स्टॅन्ड प्रमाणे आहे. नंतर या स्टॅन्डचे परिवर्तन बसस्टॅण्डमध्ये आणि बससोबत टेम्पोमध्येदेखील परिवर्तन होते, अशी टिप्पणी प्रल्हाद जोशींनी केली. राज्यात तीन ठिकाणी पोटनिवडणुका होत आहेत. या निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय होईल, असा ठाम विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. बेळगावमधून निवडणूक लढविणाऱ्या मंगला अंगडी यांचा विजय निश्चित आहे, असेही ते म्हणाले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.