Thursday, April 25, 2024

/

वाढदिवस खास .. अनेकांना होतो ग्रामीणच्या आमदारकीचा भास .

 belgaum

ए पी एम सी अध्यक्ष युवराज कदम यांचा काल वाढदिवस साजरा झाला. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा ग्रामीण मतदार संघात राजकीय चर्चेला उधाण आले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी उत्साहाने सोशल मीडियावर कदम यांच्या छबीवर भावी आमदार असे लिहून पोस्ट व्हायरल केली, आणि त्या निमित्ताने राजकीय चर्चेला ऊत आला.

युवराज कदम यांना मागील महिन्यात पालक मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या आशीर्वादाने एपीएमसी अध्यक्ष पदाची लॉटरी लागली. स्वतः रमेश जारकीहोळी यानी कदम यांना हे पद विश्वासाने जवळ करून देऊ केले हे सर्वश्रुत आहे. ग्रामीण मतदार संघातील सत्तेची साठमारी पहाता पालक मंत्र्यांनी टाकलेल्या गळाला युवराज कदम लागले की काय? याचा राजकीय निरीक्षक अंदाज घेत आहेत.

आक्का आणि पालकमंत्र्यांत यांच्यात रंगलेला कलगीतुरा बेळगावकरांना चांगलाच माहिती आहे. पालक मंत्र्यांनी ग्रामीणचा आमदार पुढील निवडणुकीत बदलायचा चंग बांधला आहे. त्यानी अनेकदा मराठी माणूस व मराठा समाजातील व्यक्तीच पुढचा ग्रामीणचा आमदार होईल असे वक्तव्य केले आहे.या पार्श्वभूमीवर युवराज कदमांच्या समर्थकांनी घातलेल्या पोस्टला वेगळाच अर्थ निर्माण झाला आहे.

 belgaum

आक्क्काच्या गोठातला नामी हिरा पालक मंत्र्याच्या तंबूत डेरे दाखल झाला आहे का ? याचा शोध ग्रामीणची जनता घेत आहे. मीतभाषी आणि शांत स्वभावाच्या युवराज कदमांच्या मनाचा ताबा पालकमंत्र्यांनी घेतला आहे का?हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. मराठा माणूस ग्रामीणचे आमदार होत असेल तर ग्रामीणची जनता युवराज याना समर्थन देईल का हा एक विचार लोकांच्यात चालू आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीत देखील नवीन चेहरा आणायच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यामुळे समितीही बळकट होणार आहे. पालक मंत्री ग्रामीण मध्ये मागील निवडणुकीत निष्प्रभ झालेल्या भाजपाला नवे नेतृत्व देऊन संजीवनी देण्याचा प्रयत्न करत आहेत का ? उत्तर आणि दक्षिण मध्ये प्रभावी असणारी भाजप ग्रामीण मधल्या मागील नेतृत्वाच्या कमकुवतपणामुळे पिछाडीवर पडली आहे. ग्रामीण भाजपात अंतर्गत पदांचे वाटपही चुकीच्या पद्धतीने झालेआहे अशी कार्यकर्त्यात चर्चा आहे. काही प्रभावहीन व निष्प्रभ कार्यकर्त्यांना पद वाटण्यात आली आहेत. त्यामुळे काही कार्यकर्त्यांत नाराजी आहे.
ग्रामीण भागात भाजपाची पाळेमोळे घट्ट करण्याचा विडा पालक मंत्र्यांनी उचलला आहे. त्यामुळे ग्रामीण भाजपतही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. ग्रामीण समितीतही होणाऱ्या बदलाच्या वाऱ्यामुळे समितीतही नवचैतन्य पसरले आहे. आक्कांच्या भूमिकेमुळे व इतर हालचालीमुळे ग्रामीणच्या राजकारणात झांझ पथक गरजनार असे चिन्ह आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.