Monday, May 6, 2024

/

अलमट्टी धरणातून विसर्ग वाढला

 belgaum

मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. अशा परिस्थितीत अलमट्टी धरणातून देखील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. त्यामुळे आता कृष्णा व वारणा नदीकाठावर असलेल्यांना पुराचा धोका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मागील चार दिवसांपासून पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे कृष्णा, वारणा नदी काठच्या भागाची चिंता पुन्हा वाढवली असून मागील वर्षीप्रमाने यावर्षी देखील पुराची भीती निर्माण होण्याची शक्यता आहे. चांदोली धरणातील विसर्ग वाढवून 12 हजार 984 क्युसेक करण्यात आलाय तर दुसरीकडे कोयना धरणातून एकूण 25000 क्युसेकचा विसर्ग करण्यात आलाय. तसेच कोयना धरणातुन दुपारपर्यंत मोठ्या प्रमाणावर विसर्ग वाढवला जाणार आहे.

कोयना धरणातून 25604 क्युसेक पाण्याच्या विसर्गात वाढ करू आज सकाळी 11 वाजेपासून कोयनात धरणातून एकूण 35000 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात सोडण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 2 वाजता एकूण विसर्ग 40000 क्युसेक करण्यात येईल. चांदोली आणि कोयना धरणातील विसर्गाच्या पार्श्वभूमीवर अलमट्टी धरणातून देखील विसर्ग वाढवण्यात आला असून तो दीड लाख करण्यात आला आहे.AAlmatti dam

 belgaum

या विसर्गामुळे सांगलीत कृष्णा नदी सोमवारी सर्वसाधारण पूर पातळी गाठण्याची शक्यता आहे. कोयना धरणातून पंचवीस हजार क्युसेक विसर्ग सुरू झाल्याने सोमवारी पाणीपातळी 35 फुटांच्या आसपास जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने सांगलीत नदी काठच्या भागात दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कृष्णा नदी काठी असलेल्या श्री क्षेत्र औदुंबर मधील दत्त मंदीरात पाणी शिरले असून जसजशी पाणी पातळी वाढेल तसे मंदीर पाण्याखाली जाण्यास सुरुवात होणार आहे.

चांदोली धरणातील पाणीसाठा 31.01 टीएमसी झाला आहे. पावसाचा जोर वाढू लागल्यामुळे चांदोली धरणातील विसर्ग आणखी वाढवून तो 12 हजार 984 क्युसेक करण्यात आला आहे. त्यामुळे वारणा नदीकाठची पिके तीन दिवसांपासून पाण्याखाली गेली आहेत. हा पाऊस असाच सुरू राहिला तर पुन्हा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.