Friday, April 19, 2024

/

‘सरकार जबाबदारी झटकत आहे का?

 belgaum

आपला जीव, आपल्या हातात असल्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना म्हंटले आहे. सरकारतर्फे अनेक नियम आणि अटी घालून दिल्या आहेत परंतु तरीही नागरिकांच्या सुरक्षिततेविषयी सरकारदरबारी तसेच वैद्यकीय क्षेत्रात कोणतीही खबरदारी घेण्यात येत नसल्याचे चित्र दिसत आहे.

राज्यात यापुढे लॉकडाउन होणार नाही, परंतु कोरोना विषाणूच्या साथीच्या तीव्रतेचा विचार केल्यास, नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी उत्स्फूर्तपणे मुखवटे घालावेत आणि सामाजिक अंतर राखावे. तसेच सरकारने घालून दिलेल्या नियमांचे आणि उपायांचे काटेकोरपणे पालन करावे, असे मत आज बी. एस. येडियुरप्पा यांनी व्यक्त केले आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी आता आपला जीव वाचविण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रथमच सोशल मीडियाच्या माध्यमातून २३ मिनिटांचे भाषण केले. हे भाषण यूट्यूब आणि फेसबुकवर प्रसारित झाले आहे.

 belgaum

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. वैद्यकीय कर्मचारी, विविध विभागांचे प्रशासकीय कर्मचारी, पोलिस, सफाई कर्मचारी यांच्यासह विविध कोरोना वॉरियर्स गेले सहा महिने अथक परिश्रम घेत आहेत. परंतु या प्रयत्नांबरोबरच जनतेचे समर्थन अधिक महत्त्वाचे आहे. अशा प्रकारच्या संवेदनशील परिस्थितीत आपली छोटा निष्काळजीपणा खूपच महाग पडू शकतो , म्हणूनच आगामी काळात आपल्याला अधिक सावध व सतर्क राहावे लागेल. असे त्यांनी म्हंटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.