Thursday, April 25, 2024

/

ठाण्यात निधन पावलेल्यावर कोगनोळी गायरानात अंत्यसंस्कार!

 belgaum

लॉक डाऊन – सीमाबंदीमुळे मुंबई येथे अपघाती मृत्यू पावलेल्या बैलहोंगल येथील एका इसमावर कोगनोळी गायरानात अंत्यसंस्कार करण्याची वेळ त्याच्या कुटुंबीयांवर आल्याची घटना बुधवारी घडली.

याबाबतची माहिती अशी की, बैलहोंगल (जि. बेळगाव) येथील लिंगराज बसवप्रभू बेळगावी ( वय 53 ) यांचे मुंबईतील ठाणे येथे अपघाती निधन झाले. तथापी कोरोनामुळे घोषित करण्यात आलेल्या लाॅक डाऊनच्या नियमामुळे त्यांच्या पार्थिवावर ना मुंबईत, ना त्यांच्या जन्मगावी बैलहोंगलमध्ये अग्निसंस्कार करता आले.

अखेर निपाणी तालुक्यातील कोगनोळी येथील गायरानात त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्याची वेळ त्यांच्या कुटुंबियांवर आली. लिंगराज हे मुंबई येथे एल अँड टी कंपनीत सेवा बजावत होते. ठाण्यात काल बुधवारी दुपारी 3 वाजता त्यांचा अपघात झाला. त्यांच्या मित्रांनी सर्व कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करून त्यांचा मृतदेह बैलहोंगलकडे पाठविला. मात्र, कोगनोळी तपासणी नाक्यावर सीमाबंदीमुळे त्यांच्या वाहनाला अटकाव करण्यात आला. बैलहोंगलला पार्थिव नेणे कठीण झाल्याने अखेर त्यांच्या कुटुंबियांनी कोगनोळी येथील गायरानात मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

 belgaum

याप्रसंगी पत्नी सुजाता बेळगावी, मुलगा, मुलगी, वडील बसवप्रभू, भाऊ शिवानंद, निपाणीचे तहसीलदार प्रकाश गायकवाड, तालुका पंचायत अधिकारी मल्लिकार्जुन उळागड्डी उपस्थित होते. लॉक डाऊन सीमाबंदीमुळे काळात आतापर्यंत चौघांच्या मृतदेहावर कोगनोळी तपासणी नाक्यांनजीक गायरानात अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.