Friday, April 26, 2024

/

ढगाळ वातावरणामुळे चिंता

 belgaum

बदलत्या वातावरणामुळे अनेक जण चिंतातुर झाले आहेत. अनेकांचे आजार बळावत आहेत अशा परिस्थितीत कोरोना सारख्या संसर्ग जन्य रोगाने अनेकात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे बदलत्या वातावरणाचा फटका आता साऱ्यांनाच बसू लागला आहे. याचा विचार करून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वीच पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांतून भीती निर्माण झाली होती. अनेक पिके वाया जाणार होती. मात्र केवळ पावसाने हजेरी लावून पुन्हा विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त करण्यात आले होते. मात्र अजूनही ढगाळ वातावरण असल्याने याचा परिणाम अनेक पिकावर होत असल्याचे दिसून येत आहे.

बदलत्या वातावरणात अनेकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे सकाळी थंडी दुपारी उष्मा आणि संध्याकाळी पुन्हा थंडी अशा परिस्थितीत नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे अनेकजण दवाखान्यात गर्दी करताना दिसत आहेत.

 belgaum

बऱ्याच देशात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनासारख्या आजाराची धास्ती आता भारत देशाला लागून राहिली आहे. कर्नाटका त्याचे दोन ते तीन संशयित आढळले आहेत.

बेळगाव शहर परिसरात सुरु असलेल्या बदलत्या वातावरणामुळे अनेक जण हैराण झाले आहेत. या वातावरणामुळे दवाखान्यात गर्दी मात्र वाढले आहे. त्यामुळे स्वच्छ वातावरण कधी निर्माण होणार याकडे सार्‍यांचे नजरा लागून राहिल्या आहेत. बदलत्या हवामानाचा फटका अधिकर पिकावर बसलेला आहे. त्यामुळे शेतकरीही त्रस्त झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.