Wednesday, April 24, 2024

/

प्रादेशिक पक्षामुळेच विकास शक्य-देवेगौडा

 belgaum

केरळ तमिळनाडू आंध्रप्रदेश दिल्ली या राज्यात प्रादेशिक पक्षांची सत्ता आहे केवळ प्रादेशिक पक्षाकडूनच विकास कामे शक्य आहेत.दिल्लीतील जनतेने जसं एका प्रादेशिक पक्षाला बहुमत दिल तसे बहुमत दिल्यास विकास शक्य असे मत माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांनी व्यक्त केलं आहे.

बेळगावात शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कर्नाटकातील तात्कालिन कुमार स्वामी सरकारचे पतन करण्यास माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या जबाबदार आहेत असा आरोप करत त्यांनी सध्याचे भाजप सरकार आपलं कार्यकाळ पूर्ण करेल ते सरकार पाडवण्याची आमची इच्छा नाही.राज्यभरात प्रवास करून पक्ष बळकट करू असे ते म्हणाले.जनता दलात निष्ठेने काम केलेल्याना मोठी जबाबदारी देऊ असेही त्यांनी नमूद केलं.

आमदार जी टी देवेगौडा बी एस येडीयुरप्पा यांच्या संपर्कात आहेत आम्ही त्यांना कोणताही व्हीप बजावला नाही मतदारसंघाचा विकासासाठी ते गेले असावेत.ते दल सोडून भाजप काँग्रेस कुठं जातील माहीत नाही त्यांनी पक्ष सोडला म्हणून इतर कुणी पक्ष सोडणार नाहीत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.