Thursday, March 28, 2024

/

बेळगावातील हिंदूंचे पुनर्वसन कधी?-उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल

 belgaum

भाजप सरकारने पाकिस्तान मधील हिंदूंचे पुनर्वसन केले आहे मात्र बेळगावातल्या हिंदू बांधवांचे पुनर्वसन कधी करणार असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला आहे.
नागपूर शिवसैनिक मेळावा होता तिथे बोलत होते.

सीमाभागातील मराठी लोक सुद्धा हिंदूच आहेत, कर्नाटकात भाजप सरकार आहे तरी सीमाभागात मराठी लोकांवर भाषिक आणि सांस्कृतिक अत्याचार होतोय. भाजप पाकिस्तानातील हिंदू लोकांचे पुनर्वसन करत आहे पण बेळगाव सीमावासीयांच पुनर्वसन कधी करणार ? असा थेट सवाल त्यांनी भाजपला विचारला आहे.

Udhav thackrey
Udhav thackrey

महाराष्ट्रातील महा विकास आघाडीचे सरकार सीमा भागातील मराठी जनतेचा प्रश्नाबाबत आक्रमक राहिले आहेत.शपथविधी झालेल्या आठच दिवसात त्यांनी बेळगाव प्रश्नी आपण आग्रही दाखवून दिले होते.

 belgaum

नागपूर अधिवेशनात पहिल्या दिवशीच सावरकर आणि नागरिकता(एन आर सी) मुद्दा गाजत असताना शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बेळगावातील मराठी माणसा बाबत मुद्दा उपस्थित केलाय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.