Wednesday, April 24, 2024

/

लग्न सोहळे दणक्यात कुठे आहे मंदी? सुरेश अंगडी

 belgaum

विमानं आणि रेल्वे गाड्या फुल्ल आहेत. लग्न सोहळेही जोरात सुरू आहेत. देशाची अर्थव्यवस्था मजबूत असल्याचं हे लक्षण आहे. त्यामुळे देशात मंदी आहे, असं कसं म्हणता? असा अजब सवाल रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी केला आहे. अंगडी यांच्या या तर्कटावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

यापूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही देशाची अर्थव्यवस्था मजबूत असल्याचं म्हटलं होतं. देशात एक-एक सिनेमा कोट्यावधीचा गल्ला जमवत आहे. त्यामुळे देशात मंदी आहे असं कसं म्हणता? असा सवाल प्रसाद यांनी केला होता. पुराव्यादाखल त्यांनी सिनेउद्योगाचं उदाहरण दिलं होतं. २ ऑक्टोबर रोजी रिलीज झालेल्या तीन चित्रपटांनी १२० कोटींची कमाई केली आहे. अर्थव्यवस्था सुदृढ आहे, म्हणून तर चित्रपटांनी एवढी कमाई केली. त्यामुळे देशात मंदी आहे, हे कशाच्या आधारावर बोललं जातंय, असा सवाल त्यांनी केला होता. प्रसाद यांच्या या विधानावर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. त्यानंतर त्यांनी सारवासारव करत त्यांचं विधान मागे घेतलं होतं.

यापूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही देशाची अर्थव्यवस्था मजबूत असल्याचं म्हटलं होतं. देशात एक-एक सिनेमा कोट्यावधीचा गल्ला जमवत आहे. त्यामुळे देशात मंदी आहे असं कसं म्हणता? असा सवाल प्रसाद यांनी केला होता. पुराव्यादाखल त्यांनी सिनेउद्योगाचं उदाहरण दिलं होतं. २ ऑक्टोबर रोजी रिलीज झालेल्या तीन चित्रपटांनी १२० कोटींची कमाई केली आहे. अर्थव्यवस्था सुदृढ आहे, म्हणून तर चित्रपटांनी एवढी कमाई केली. त्यामुळे देशात मंदी आहे, हे कशाच्या आधारावर बोललं जातंय, असा सवाल त्यांनी केला होता. प्रसाद यांच्या या विधानावर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. त्यानंतर त्यांनी सारवासारव करत त्यांचं विधान मागे घेतलं होतं.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.