Friday, March 29, 2024

/

शाळा सोडलेल्या रितूला गरज आहे दानशूरांच्या मदतीची

 belgaum

दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला घरच्या बिकट परिस्थितीमुळे शाळा सोडून घरची जबाबदारी सांभाळण्याची वेळ आली आहे.रितू पाटील (१६) राहणार बेकीनकेरे असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.तिची आई लक्ष्मी आणि वडील एकनाथ पाटील यांच्यात मतभेद झाल्यामुळे आईने पतीचे घर सोडून माहेर गाठले.माहेरी बेकीनकेरे येथे लक्ष्मी रितू, रोहिदास (१५) आणि रोहिणी या मुलासमवेत आपल्या माहेरी आई,वडिलांकडे राहत होती.

वडील यल्लप्पा सावंत आणि आई शांता हे त्यांचा सांभाळ करत होते.पण नैराश्य आणि ताण तणावामुळे लक्ष्मी आजारी पडली आणि तिचे २०१२ मध्ये निधन झाले.त्यानंतर देखील आजी,आजोबांनी आपल्या तीन नातवंडाचा सांभाळ केला.त्यांची शाळा ,अभ्यास व्यवस्थित चालला होता पण दैवाला हे पाहवले नसावे.त्यांच्या आजीचे ऑगस्ट महिन्यात निधन झाले आणि त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला.आजीचे निधन झाल्यामुळे रितूच्या खांद्यावर घरची जबाबदारी पडली.

Ritu

 belgaum

लहान भाऊ , बहीण आणि सत्तर वर्षाच्या वृद्ध आजोबांचा सांभाळ करण्याची जबाबदारी तिच्यावर आली.त्यामुळे तिला शाळा सोडायला लागली.त्यामुळे रितू घरात स्वयंपाक करणे,धुणी भांडी करणे आणि बहीण ,भावाला तयार करून शाळेला पाठवणे या कामात गुंतली आहे.त्यांचे राहते घर देखील मुसळधार पावसामुळे पडले असून ग्राम पंचायतीने त्याचा अहवाल पाठवला आहे.तिच्या आजोबांची अडीच एकर शेती आहे पण तेथे पाणी नाही.

आजोबांना एक हजार पेन्शन मिळते आणि अन्न भाग्य योजनेतून धान्य मिळते त्यावर त्यांची गुजराण चालली आहे.शिक्षणाधिकारी ए बी पुंडलिक यांना रितूची माहिती दिल्यावर त्यांनी आपण भेट देऊन तिला पुन्हा शाळेला येण्यासाठी मनपरिवर्तन करणार असल्याचे सांगितले.आता गरज आहे ती दानशूर आणि दयाळू व्यक्तींनी पुढे येऊन रितू आणि तिच्या कुटुंबाला आधार देण्याची.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.