Friday, March 29, 2024

/

जलप्रलयात युवकांचे योगदान महत्वाचे

 belgaum

बेळगावात निर्माण झालेली परिस्थिती, रात्री-अपरात्री वाढणारे पाणी, अडकणारे नागरिक आणि ठीक ठिकाणी करावी लागणारी मदत या बाबतीत प्रशासन वेगवेगळ्या यंत्रणांची घोषणा करत असले तरी स्थानिक पातळीवर जाऊन पोचले नाही. यामुळे या कामात वेग वेगळ्या भागातील युवकांनी बजावलेली भूमिका फार मोलाची आहे .

दिवसभर आणि मध्यरात्रीपर्यंत युवक काम करत होते . मदतीसाठी धावून जात होते. यामध्ये सर्वभाषिक युवकांचा समावेश होता .कुठली जात-पात भाषा धर्म भेद न पाहता कुठल्याही पक्षाचे किंवा कसलेही बंधन न पाळता युवक मिळेल त्या माणसाला मदत करत होते. यामुळे बेळगाव शहरातील युवकांची मदतीची भावना किती तीव्र आहे ,याची जाणीव झाली. निर्माण झालेला पूर ही तशी बेळगाव शहरासाठी पहिलीच घटना.

यापूर्वी या प्रकारची परिस्थिती कधी निर्माण झाली नाही. दरवर्षी नाले फुटून काही ठराविक भागात पाणी साचत होते. मात्र यावर्षी संपूर्ण शहर जलमय झाले आणि शहराला वाचवण्यासाठी गरज होती ती स्थानिक पातळीवर राबणाऱ्या कार्यकर्त्यांची. हे कार्यकर्ते मिळाले ते युवकांच्या रूपाने. कारण महानगरपालिका जिल्हा प्रशासन व इतर यंत्रणा फोन नंबर देऊन हेल्पलाइन नंबर देऊन शांत राहिले असताना युवकांनी मात्र प्रत्यक्ष पाण्यात उतरून काम करण्याचे योगदान दिलेले आहे. आता यापुढील जबाबदारी मोठी आहे .

 belgaum

Ramsena

पुरातून सावरत चाललेल्या नागरिकांना नित्योपयोगी वस्तू घेऊन देण्याची मोठी भूमिका निभावावी लागणार आहे .कारण अद्याप सर्व सुटसुटीत होण्यास वेळ लागणार आहे.
आज सकाळपासून पाऊस थांबला असला तरी तो पूर्णपणे थांबेल की पुन्हा पडेल याची शाश्वती नाही .घराघरात पाणी शिरल्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती सुधारण्यासाठी किमान आठवड्याभराचा काळ लागेल. या काळामध्ये नागरिकांना दूध चहा खाण्याचे पदार्थ आणि इतर वस्तू घेऊन देण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील .या कामातही युवकांचे योगदान मोठे ठरणार आहे. बेळगाव शहरात या प्रकारची घटना आधी कधीच घडलेली नाही. त्यामुळे निसर्गाने निर्माण झालेल्या परिस्थितीत कसे जगावे हे बेळगावकरांना शिकवले आहे. वाढत्या शहरीकरणात नाल्यांवर आणि इतर ठिकाणी अतिक्रमण करणारे बिंदास आहेत. मात्र गोरगरीब जनतेला याचा त्रास सहन करावा लागला आणि या कामी त्यांच्याच गल्लीतील गल्लीतील युवक कामाला आले. हा प्रकार या चार ते पाच दिवसात पहायला मिळाला आहे.

बुधवारी मध्यरात्री पर्यंत युवक प्रत्येक रस्त्यावर राबत होते .वाढत असलेल्या पाण्यातून जाणाऱ्या वाहनांना वाट मोकळी करून देत होते त्यामुळे या युवकांच्या कार्याला वंदन करावे तितके कमीच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.